Categories

Aeroplanes

Aeroplanes

Tuesday 30 June 2009

नंबर्सचे लौजिक...

रोजच काही ना काही शिकायला मिळतं.... आत्ताच एका मित्राची मेल आली... नंबर्सचे लौजिक...अर्थात आपण जे १,२,३ अंक लिहितो [इंग्रजी मध्ये!] , त्यांना वन, टु, थ्री... का म्हणतो... किंवा त्यांचा आकार तसा का आहे.. किंवा वन ला टु आणि टु ला थ्री का म्हणत नाही? त्याच्या पाठीमागे अँगल्सचे लौजिक असतं म्हणे.. आजच कळाले!

वन या इंग्रजी अक्षरामध्ये एकच अँगल असतो.. टु मध्ये दोन, थ्री मध्ये तीन आणि अशाप्रकारे नाइन मध्ये नऊ अँगल्स असतात... तर झीरो एकही अँगल नसल्यामुळे गोल आहे!

हे प्रेझेन्टेशन पहा.. म्हणजे लक्षात येइल, मला काय म्हणायचे आहे ते..

वांद्रे-वरळी सी लिंक आणि राजकारण!

...राजकारण गेलं चुलीत म्हणतात ते काही खोटं नाही.. एवढा चांगला लिंकरोड झाला... लोकांची सोय झाली.. आणि राजकारण्यांना चेव चढलाय - नामांतराचा!



मला मात्र एक गोष्ट समजत नाही... नामांतरावरुन एवढा गोंधळ का? कशासाठी... ? राजीव गांधी किंवा सावरकरजी - दोघांच्याही नावाचे राजकारण करण्याची गरज नाही. सत्तारुढ पक्षाने "राजीव गांधी" असे नामकरण केले तर विरोधी पक्षाचे आक्षेप.... मात्र हाच पक्ष सत्तारुढ असता आणि सत्तारुढ विरोधी पक्ष असतात तर ही हे प्रकरण असेच रंगले असते.. तेंव्हा हा पक्ष योग्य आणि तो अयोग्य असे होत नाही ना? एखाध्याने चांगलं काम केलं तर त्यात पाय आडवा आणायलाच पाहिजे का? नामकरण ज्यांच्या म्हणण्याप्रमाणे झाले नाही तर असे लोक या रोडचा वापर करण्याचे सोडतील का? किंवा, सावरकरांचे नाव दिले तर सत्तारुढ पक्षाचे नेते या रोडवरुन येणे-जाणे वर्ज करतील.... दोन्हीही प्रश्न्नाचे उत्तर नाही, असेच आहे! मग वाद कशाला?
.... स्वदेस, सिनेमातला तो "मेलाराम" आणि त्याची मोहनला [शाहरुख खान] दिलेली पार्टनरशीपची औफर आठवतीय का.. त्यात तोही "मेलाराम का मोहन ढाबा" किंवा "मोहन का मेलाराम ढाबा" असे सुचवितो! मात्र शेवटी तोच हा विषय सोडुन देतोच ना!

असो... वादावादी कीतीही चालो... आपण मात्र मुंबईला गेलो कि या रोडवरुन एक चक्कर जरुर मारणार! आतापर्यत परदेशात आणि सिनेमातच पाहिलेलं असे रोड आता आमच्या भारतात - मुंबईत ही आहे, असं अभिमानाने सांगण्यासाठी आणि तो अनुभव घेण्यासाठी!