Categories

Aeroplanes

Aeroplanes

Showing posts with label भटकंती. Show all posts
Showing posts with label भटकंती. Show all posts

Sunday, 4 October 2009

गडदचा बहिरी: ढाक बहिरी

स्वाईन फ्लु चा भीतीने म्हणा अगर बाऊने म्हणा, सप्टेंबर महिना भटकंतीशिवायच गेला. आता सलग आलेल्या गेल्या लाँग विकेंडचा प्लान बनवायलाच पाहिजे असं ठाम मत झाले. मात्र गुडघ्याचं दुखणं त्यावर अडचण आणतं की काय असं राहुन राहुन वाटतच होतं. पण मन मानतच नव्हते. अगदी क्नी पॅड घालुन मी मनाचा ठीय्या करुन जायचेच ठरवले आणि बर्‍याचवेळा प्लान करुन ऐनवेळी बदललेला - ढाकचा ट्रेक फायनल झाला. नेहमीप्रमाणे मेला-मेली झाली. मात्र लॉंग विकेंडचे काही लोकांचे प्लान आधिच बनले असल्यामुळे बरेच जण यावेळी स्वॉरी म्हणाले.


तरीपण मी, सुरिंदर, सिद्दार्थ [पुण्याहुन], बल्लु [विशाल द जायंट], स्टीव्ही [मुंबईहुन] आणि विशाल, अंजन आणि कपिल लोणावळ्याहुन असा ग्रुप बनला. ऐनवेळी गाडी न मिळाल्याने लोकलने लोणावळ्यापर्यंत जायचे आणि तिथुन पुढची वाटचाल सुरु करण्याचे ठरले.


सकाळची ६.१५ ची लोकल हुकली त्यामुळे ६.५० ची डेक्कन क्विन पकडुन आम्ही लोणावळयाला पोहोवचलो. बाकी मंडळी वाटच बघत होती. स्टेशनच्या बाहेरच मस्त गरमागरम वडापावचा नाष्टा करुन आमची गाडी ढाकच्या दिशेने रवाना झाली. ढाकला जाण्यासाठी आम्ही लोणावळ्याहुन कामशेतकडे जाणारा रस्ता पकडला. रस्त्यात तुंगार्ली " वादिवले धरण " लागते, हे आपण बरोबर रस्त्यावर असल्याचा संकेत समजावा! तसे, कर्जतहुनही ढाकला जाता येते. शिवाय " सांडशी " गावातुनही रस्ता आहे. अंदाजे ९.०० वाजता पायथ्याशी असणार्‍या "जांभवली" गावात गाडी लाऊन आम्ही ट्रेकला सुरुवात केली. ढगाळ वातावरण, स्वच्छ हवा ट्रेक, चारी बाजुनी दिसणारे डोंगर आणि वाटेच्या दोन्ही बाजुला पिवळ्या धमक फुलाचा तांडवा जणु आमचे स्वागतच करत होते.

सभोवताली पसरलेला निसर्गाचा हिरवागार शालु..... वेगवेगळ्या रंगांची फुले, जणु त्या शालुवर रंगीत बुट्टी सारखे शोभत होते. सिनेमाशिवाय असे लोकेशन पाहणे सध्या तरी दुरापास्तच वाटते. डीडीएलजे मधील तो पिवळ्या धमक फुलांचा सिन तुमच्या लक्षात आहे का? अगदी तसाच किंवा त्यापेक्षाही उजवा निसर्ग आम्ही अनुभवत होतो. काही वर्षांपुर्वी राजगडच्या रस्त्यावर फुलांचा असा मखमली गालिचा पाहिला होता. या सिजनमध्ये यायचे ठरवल्याने आम्ही स्वत:ला धन्य समजत होतो.

गावाच्या मागच्या बाजुने जाणारी छोटीशी वाट बहिरीच्या गुहेकडे जाते. रस्त्यात अनेक छोटे धबधबे लागतात. त्यांचे ते शांत वाहणारे पाणी, सभोवताचा हिरवागार परिसर, मला नक्की शब्दांत मांडता येणार नाही. सगळे वातावरण अगदी अवर्णनिय! काही अंतर चालुन गेल्यानंतर थोड्याशा सपाट जमिनीवर दोन रस्ते लागतात. उजव्या हाताने तुम्ही ढाकच्या दिशेने जाता तर डाव्या बाजुने गेल्यास कोंढाणेश्वराचे मंदीर लागते. आम्ही कोंढाणेश्वराचे दर्शन घेऊन पुढे जाण्याचे ठरविले आणि डाव्या रस्ताने चालु लागलो. रस्त्यात अगदीच एक-दोन घरे लागतात आणि बोटावर मोजण्याइतकी माणसे! एका मावशींना मंदीराचा सस्ता विचारुन आम्ही मंदीरात पोहोचलो.

मंदिरारच्या बाहेरच एका आजीने आम्हाला मंदिरात जायचे असल्यास दक्षिणा द्यावाच लागेल असे सांगितले. आम्ही काही हरकत न घेता दर्शन घेतले. आजींशी बोलताना - अगदी पाच - दहा मिनिटे ओरडुन - ओरडुन सांगितल्यावर आम्हांस समजले की त्यांचा ऐकुच येत नाही! तशातही विशालने हार न मानता त्यांच्याकडुन ढाकचा रस्ता विचारुनच घेतला!! मंदिराच्या आसपासचा परिसर अतिशय शांत आणि निसर्गरम्य आहे. पाठीमागुनच एक छोटासा पाण्याचा धबधबा किंवा झरा - ओढा म्हणता येईल असे वाहते पाणी आहे. शिवाय दोन कुंडासारखे डोह ही आहेत. मंदिराच्या समोरचा नंदी अगदी नजरेत भरावा असा मोठा आहे. आसपास मंदिराचे काही अवशेष विखुरलेल्या अवस्थेत पडुन आहेत. दर्शन घेऊन आम्ही मंदिराच्या पाठीमागुन जाणार्‍या रस्त्याने ढाकची वाटचाल सुरु ठेवली.

रमत गमत - फोटोगिरी करत आमची वाटचाल चालु होती. आता भुक नावाची प्रक्रिया जोरात चालु असल्याचे जाणवु लागले होते म्हणुन आम्ही एक पठार पाहुन मस्त जेवणाचा प्रोग्राम ठेवला. लोणावणळ्यात घेतलेले वडापाव [पंकजच्या भाषेत - बातम्या खाणे ;-) ] आणि अंजनने आणलेले जेवण संपविण्याचा बेत केला. मग थोडी विश्रांती घेऊन पुढच्या चालीसाठी तयार!

अंदाजे एक - दिड तास जंगलवजा झाडीतुन चालल्यानंतर ढाकच्या गुहेच्या आधी येणारी खाई येते. अगदीच चिंचोळा भाग - खिंड म्हणा ना! आणि येथुनचा पुढच्या सहसी वाटचालीला सुरुवात होते. पुढच्या वाटचाली आधी आम्ही थोडी रेस्ट करण्याचे ठरवुन जरा आडवे झालो. दहा - पंधरा मिनिटांनी विशालने वेळेची आणि होणार्‍या अंधाराची जाणीव करुन देत सर्वांना पुढे रेटले. खिडीच्या सुरुवातीला अगदीच सोपी वाटणारी ही छोटीशी वाट दुसर्‍या टोकाला अगदीच निमुळती आहे. ८ - १० मीटरची ही खिंड माणुस जेमतेम मावेल अशी आहे. अगदी आपल्या पोटाचा अंदाज करुन देणारी! हळु आणि सावधानतेने आम्ही सारे खाली उतरलो. उजव्या बाजुला प्रचंड कडा आणि खाली खोल खाई. नविन भटक्यांचे अगदी डोळे फिरवेल अशी. त्या कड्याच्या बाजुने जाणारी छोटीशी पायवाट बहिरीच्या गुहेकडे जाते. अंदाजे ५० - ६० मी. असणारी ही वाट पार करणे म्हणजे दिव्यच वाटते. घसरडी वाट आणि खाली दिसणारी खोल दरी यांचा मध्य साधुनच ही वाट पार करावी लागते. आता पर्यंत अगदीच नॉर्मला वाटणारा ट्रेक आता हळु - हळु डेंजरस व्हायला लागला होता!

काळ्या पाषणावर काही ठीकाणी ट्रेकर्सनी क्लिप लावल्या आहेत. त्या वाटेवर सापडणारी खाच आणि त्या क्लिप्स एवढेच! हा पॅच पार केल्यानंतर अंदाजे ८-१० मी. चा उभा पायर्‍या असणारा पॅच लागतो. इथे मात्र मनाची जोरदार तयारी लागते. स्वत:वरचा आत्मविश्वास किंचितही कमी होऊ न देता हा पॅच पार करावा लागतो. वरती पोहचताच बहिरीच्या दारात लावलेले झेंडे दिसतात. त्याखाली शिडीच्या नावाने उभे असणारे फांदीचे लाकुड आणि दोन-तीन लोंबकळणारे दोर! आता त्या दोरांपर्यंत पोहचण्यासाठी पुन्हा एक छोटाशी वाट आहे. पावसामुळे ती अगदीच निसरडी झाली होती. मात्र त्याठीकाणी लावलेल्या क्लिप्स उपयोगी आल्या. अंजनने पुढे चढुन त्या क्लिप्स मध्ये दोर लावला.

आता शिडीपर्यंत पोहचण्यास एक आधार झाला होता. काळजी घेत - घेत आम्ही एकेकाला पुढे पाठवत होतो. दोरीच्या दुसर्‍या टोकाला पोहोचल्या नंतर त्या फांदी कापलेल्या लाकडावरुन - लोंबकळणारा दोर पकडुन वरती जायचे होते. हा पॅच अगदीच कठीण होता. स्वतःबरोबर आता बहिरीवरही विश्वास ठेवणे जरुरी होते. त्या लाकडावर उभे राहुन - दोर हातात पकडुन एक नजर खाली टाकली तर भल्या - भल्यांचेही डोळे फिरतील अशी अवस्था होते. पाठीवरची सॅक संभाळत आम्ही एक - एक जण वरच्या गुहेत पोहोचलो. अगदी शेवटचा पायरी ओलांडुन तुम्ही बहिरीच्या समोरच उभे राहता. अंदाजे २.३० वाजता आम्ही सारे सुखरुप वरती पोहोचलो.

हा बहिरी फार रागीट आहे. बाईमाणसांचा वाराही त्याला चालत नाही. विटाळचांडाळ करविण्यास तो समोरच्या पाताळस्पर्शी दरीत ढकलुन देतो म्हणे [ अर्थात त्यात काही अर्थ नाही हे आता अनुभवाने सर्वांना कळलं आहे. ]
संदर्भः साद सह्याद्रीची - प्र.के. घाणेकर.

बहिरी हा ठाकरांचा देव! तसा कोणताही खास असा आकार नसणारा हा देव! - एक भल्या मोठ्या दगडाला शेंदुर लाऊन त्यावर डोळे लावलेले... डोळ्यात पाहता अगदी तुमच्या समोरच उभे असळ्याची जाणीव करुन देणारा. बाजुलाच नवसाचे त्रिशुल लावलेले. आसपास उदबत्त्या आणि हळद - कुंकु. बाजुला पाण्याचे भले मोठे टाके. त्यावर तरंगणारी आणि काही बुडलेली भांडी. याच भांड्याचा वापर करुन तिथे जेवण तयार करता येते. वापरुन झाल्या नंतर स्वच्छ करुन परत तिथेच ठेवण्याची पध्दत. त्यांची चोरी करणे म्हणजे बहिरीच्या कोपाला आमंत्रण देणे आहे. असे करणर्‍यास बहिरी समोरच्या खाईत लोटुन देतो अशी भावना आहे, आणि ती वर्षानुवर्षे कायम आहे!

या प्रसिध्दिपराड्.मुख बहिरोबाची शहरी पर्यटकांना ओळख करुन देण्याचे श्रेय माननीय श्री.गो. नी. तथा अप्पासाहेब दांडेकरांना जाते.या गुहेतल्या बहिरीला सारेजण "गडदचा बहिरी" म्हणुन ओळखतात. - गडद म्हणजे गुहा.
संदर्भः साद सह्याद्रीची - प्र.के. घाणेकर.


कुंडातुन पाणी घेऊन आम्ही हात पाय धूऊन बहिरीचे दर्शन घेऊन समोरच्याच गुहेत आराम करण्यास बसलो. विशालने सोबत आणलेला नारळ चढवुन सर्वांना प्रसाद वाटला. एव्हाना धुक्यांचे लोट वहायला सुरुवात झाली होती. थोड्याशा विश्रांतीनंतर आता खाली उतरायचे टेंशन यायला लागले होते. कोणत्याही ट्रेक मध्ये चढयापेक्षा उतरणेच फार कठीण जाते, याचा अनुभव आम्हा सर्वांनाच होता. खालुन पुण्याचाच मुलांचा एक ग्रुप वरती चढत होता. त्यांना वरती येईपर्यंत वाट पाहुन आम्ही खाली उतरण्याचे ठरवले.

बहिरीला नमस्कार करुन आम्ही एक - एक जण खाली उतरु लागलो. खाली उतरलेल्याने त्याच्या नंतर खाली उतरणार्‍यास मदत करत आम्ही खालच्या त्या बांधलेल्या रस्सीपर्यंत पोहोचलो. तो पर्यंत आणखी एक ग्रुप पोहोचला होता. त्यांच्यासाठी रस्सी ठेऊन आम्ही थांबायचे ठरवले. मात्र विशाल आणि अंजनने ती रस्सी वरती गेलेल्यांना खाली उतरण्यासाठी आणि मागाहुन येणार्‍यांसाठी तशीच बांधुन ठेवण्याचे ठरवले. सर्वांनी त्याला दुजोरा देत आम्ही खाली उतरण्यास सुरुवात केली.

परतीचा तोच रस्ता आता धुक्यामुळे अधिकच धुसर वाटत होता. त्यातही वाहणारा वारा अंगाला गारवा देत आमचा थकवा दुर करत होत. खिंडीच्या मुखाला पोहचुन आम्ही पुन्हा थोडी विश्रांती घेतली आणि मग परतीचा रस्ता सुरु ठेवला. एक - दिड तासांच्या चाली नंतर मात्र आता चांगला घाम निघाला होता. एका ठीकाणी छोटासा धबधबा पाहुन आम्ही सर्वांनी पुन्हा एक ब्रेक घ्यायचे ठरवले. मी मात्र त्यात नॅचरल बाथ घ्यायचे ठरवुन मस्त ठंडा - ठंडा स्नान केले आणि मग फ्रेश मनाने आणि शरीराने गाडीच्या दिशेने चालु लागलो. परतीच्या मार्गात - असा हा निसर्गरम्य परिसर सोडुन जाण्याचे कोणाचे मन होत नव्हते. पण दोस्त - संसारी दुनियेत अजुनही कामे आहेतच ना!

रस्त्यामध्ये - कामशेत मध्ये "टोनी दा ढाबा" वर जेवण करुन आम्ही कामशेत स्टेशनवरुन पुण्याची लोकल पकडली. पुणे स्टेशन वर पार्क केलेल्या बाईक्स घेऊन १०.४५ ला घरी!

एका साहशी ट्रेकची अनुभुती आणि प्रचंड निसर्गातल्या एका रौद्र देवतेचे दर्शन घेऊन सुखरुप परतल्याचे समाधान सार्‍यांच्या चेहर्‍यावर दिसत होते!

फोटो - आहेतच हे पहा!

Sunday, 2 August 2009

भटकंती: शिडीच्या वाटेने - भीमाशंकर!

पेबच्या भटकंती नंतर आता पुन्हा पावसाळी ट्रेकची स्वप्नं पडु लागली होती.... पण कुठं जायचं... तसे पर्याय भरभुर होते, पण विशाल म्हटला की त्याला भीमाशंकरला त्रिशुल आणि शिवलिंग यांची पुजा करुन स्थापना करायची आहे... मग काय.. भीमाशंकर लाच जायचं ठरलं... मेल - फोनची देवाण-घेवाण झाली आणि १ ऑगस्टला भीमाशंकरचा जंगल ट्रेक करायचा ठरला! इंटरनेवरुन बरीच माहिती काढली... कसं जायचं... कुठ रहायचं... आधी जाऊन आलेल्यांकडुन माहिती घेणं वगैरे - वगैरे! शिडी घाट की गणेश घाट असा वाद बराच रंगला.... कारण शिडी घाट म्हणजे "वन्स इन लाइफटाइम" म्हणता येइल असा थ्रिलिंग आहे, अंदाज एकंदरीत माहितीवरुन आला होताच! तेंव्हा तिथे जाऊनच ठरवु असे ठरवुन पुढच्या तयारीला लागलो.
कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्रमाथां मुकुटीं झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदु:खहारी । तुजविण शंभो मज कोण तारी ॥ १ ॥
पुर्ण वाचा...

आमच्या ऑफिसमधुन मी, अर्नब, सतिश, अमोल आणि दोन मित्र - सुरिंदर आणि रवि असे पुण्याहुन सातजण तयार झाले.... तर मुंबईहुन विशाल, उपेंद्र, स्टीव्ही, विशालची बहिण अर्चना आणि तिची मैत्रीण रचना असे पाच जण... एकंदरीत बारा लोक.. पुण्याच्या बर्‍याज जणांना शनिवारीच परत यायचे होते त्यामुळे आम्ही मुक्काम रद्द केला... असो.. तर नेहमीचीच ठरलेली जीप - सुमो घेऊन आम्ही सकाळी सातला पुण्याहुन निघालो... एक्सप्रेसवे - खोपोली - कर्जत करत, अंदाजे ९.३० ला "खांडस" या गावात पोहोचलो... मुंबईकरांना ट्रेन लेट झाल्यामुळं १२.३० वाजले.. तो पर्यंत आम्ही हलकासा नाष्टा करुन घेतला... आणि शिडी घाटाने जाण्यासाठी एक गाइडही ठरवला. गाइड ठरवताना शक्यतो तरुण ठरवा - कारण शिडी घाटामध्ये त्याची मदत लागतेच!

मुंबईकर आल्यानंतर वेळ न घालवता आम्ही खांडस गावातीतुन आमच्या मार्गी लागलो. ह्या डांबरी रस्त्याने अंदाजे २ की.मी. चालल्यानंतर एक आडवा रस्ता लागतो. उजव्या हाताला जाणारा रस्ता गणेश घाटातुन जातो तर ओढ्याच्या जवळुन जाणारी पायवाट शिडीघाटाकडे जाते. सोबत गाइड असल्यामुळे आम्ही जास्त डोकं चालवण्याच्या भानगडीत पडलोच नाही...! पुन्हा एकदा सर्वांची संमती घेऊन आम्ही शिडी रस्त्याने जायचे नक्की केलं आणि त्या मार्गे चालुही लागलो! समोरचा हिरवागार डोंगर जणु खुणावतच होता... दुरुन दिसणारे शिडी घाटातले दोन धबधबे त्यात भरच घालत होते... त्यांच्या खाली दिसणारा काळा कातळ दगड मात्र शिडी घाटाचा अंदाज देत मनात धडली भरवणारा!

गप्पा मारत मारत आतापर्यतचे अंतर अगदीच आरामात कापले होते...अंदाजे अर्ध्या तासाने एक छोटासा ओढा लागतो... सगळ्यांनी मस्त चेहर्‍यावर पाणी मारुन - पिऊन घेतले... सकाळपासुन आम्ही पावसाची अपेक्षा करत होतो.. मात्र पाऊस पडण्याचे नावच घेत नव्हता... हवेतील उकाडा आता जाणवायला लागला होता.. पाण्यात भिजऊन मी रुमाल डोक्याला बांधला... तेवढाच थंडावा! काही वेळानं आम्ही पहिल्या शिडीच्या जवळ पोहोचलो... अगदी सोपी वाटणार्‍या ह्या शिडीजवळ पोहोचल्या नंतरच तिचा अंदाज येतो.... खालुन दुसरी आणि वरुन पहिली पायरी तुटलेली ही "पहिली शिडी"! पहिली शिडी ही दोन दगडी पॅच जोडते.. तेही अगदी उभी [ मात्र ९० अंशात नक्कीच नाही]... मध्ये - खाली पाहिलं तर खाई! तेंव्हा अगदी सावधानतेनेच ही शिडी पार करा.

पहिली शिडी पार केल्यानंतर लागणारा दगडी पॅच अगदी तुमच्या हाताची शक्ती अन् तुमच्या मनाच्या तयारीचा अंत पाहणारा....! खाली पाय ठेवायला एखादी खाच.... त्या कातळ दगडाच्या खाचीत हात घालुन आपले पुर्ण वजनहातावर सांभाळत पुढे सरकावे लागते. याचवेळी आपल्या वाढलेल्या वजनाचा अन् पोटाच्या घेराचा खरा अंदाज येतो! स्वतःला उभारण्यापुरती जागा पाहुन मी एकेकाला पुढे जाण्यासाठी - त्यांच्या पाठी - दरीच्या बाजुना उभा राहुन आणि "यु कॅन डु इट!" असा मॉरल सपोर्ट देत - देत एकेकाला पुढं पाठवत होतो.... याच ठीकाणी "शांताराम" नावाच्या गाइडने केलेली मदत ही न विसरण्यासारखी! त्याच्या मदतीचे आभार माणण्यासाठी १०० रु. देऊ केले... मात्र ही त्याच्या मदतीची अन् चांगुलपणाची किंमत नक्कीच नाही....! तुम्ही जर प्लान करत असाल तर खांडस गावातुन "शांतारामला" जरुर बरोबर घ्या!

पहिली शिडी पार केल्यानंतर जवळच दुसरी शिडी आहे.. ही पहिली पेक्षा जरा लांब... मात्र कोणत्याच शिडीला खालुन वरुन सपोर्ट नसल्यामुळे बर चढताना बरीच हलत होती..... शिवाय थंडगार पाणीही अंगावर उडतच होते.. पाऊस असता तर कदाचित वरुन पडणार्‍या पाण्याचा मार जोरदार लागला असता.... आणि शिवाय हा रस्ताही अधिकच रिस्की झाला असता! सर्वांना पुढे धाडत ... खांद्यावरची ती चार पाच किलोची सॅक सांभाळत मी सर्वात शेवटी मी दुसरी शिडीही पार केली!

दुसर्‍या शिडीनंतर थोडीशी उभी चढण आहे... सावध - सांभाळत आंम्ही तिसर्‍या शिडीपर्यंत पोहोचलो... ही शिडी सर्वात नविन म्हणता येइल.. आधी हिच्या जागी लाकडी शिडी होती... पावसाळ्यात काय हालत होत असेल ना? माझ्या माहितीनुसार धुमकेतु ग्रुपने ही शिडी - लोखंडी - बसवली आहे... अशा या मोक्याच्या ठीकाणी शिडी लावुन रस्ता केल्याबद्दल त्यांचे अनेक आभार! शिडी इतर दोन शिड्यांपेक्षा जरा लांबच आहे.. शिवाय - खाली आणि वरती फक्त टेकवली असल्याने भकाम असा सपोर्ट नसल्याने पुन्हा हवेतच! या शिड्या चढताना आपले वजन शक्यतो पुढच्या बाजुला झुकलेले ठेवा.... म्हणजे शिडी नेहमी पुढच्या बाजुने दगडाला चिटकुन राहील...!

ही शिडी संपली की पुन्हा थोडी उभी दगडावरची चढण आणि एक वळण - उजव्या हाताला. हे वळण घेताना, शेजारच्या दगडाला गोल - पकडुनच सरकत रहा... शक्यतो खाली पाहु नका...! या ट्रेकचा बराचसा भाग एका-वेळी-एकच जाऊ शकेल असा आहे.... त्यामुळे घाई - गडबड करु नका...आणि हो.. स्वतःवर विश्वास ठेवा.... भीतीमुळे तुम्ही अर्धे अवसान गाळुन बसला तर तुमची ही अवस्था तुमच्या बरोबर इतरांनाही त्रासदायक ठरते!

हे वळण घालुन थोडं पुढे काही अजुन अंतर चालल्या - चढल्या नंतर मस्त धबधबा लागतो.. [पहिल्या फोटोतल्या दोन धबधब्यांपैकी हा डाव्या हाताचा!]..... बस्स! सगळी मंडळी या ठीकाणी थोडा आराम म्हणुन बसलो... पैकी काहीजण लगेचच धबधब्याखाली गेले.. मस्त पाण्याखाली भिजुन, खाण्यासाठी बसले.... गुड-डे, खजुर आणि मुंबईवाल्यांनी आणलेल्या ब्रेड - बटरवर मस्त ताव मारला.... मात्र पोट भरुन जेवणाचा - खाण्याचा मोह अशावेळी टाळावाच लागतो.. नाहीतर बाकीचं अंतर चालणे होणारच नाही....! गाइड काका चला - चला.... अजुन बरंच जायचं आहे असं म्हणुन सर्वांना पुन्हा मार्गी लावत होते... एकंदरीत आम्ही शिडीचा - अवघड भाग पार केला होता.. मात्र अजुन बराचसा भाग चढायचा बाकी होता... मग.. पुन्हा चढाइला सुरुवात!
बाकी ... खाल्ल्यानंतर ... आपण आणलेला आपला मौल्यवान कचरा पुन्हा आपल्याच बॅगेत भरुन परत न्या! शहाण्यासी पुन्हा - पुन्हा सांगणे न लगे!..!

हा चढ संपला की मस्त पठार लागते... थोडयाच अंतरावर एक झोपडीवजा चहाची सोय असणारे हॉटेल [?] दिसते... गाइडकाकांनी पुन्हा समोरचा डोंगर दाखवत तो चढायचा असल्याचे सांगितले....म्हणजे अजुनही जवळ - जवळ अर्ध्याहुनही जास्त अंतर पार करायचे बाकी होते!.. तेंव्हा मात्र सगळेच त्या झोपडीत घुसले... चहा पिल्यावरच पुढे - एकच कल्ला!.. मग काय.... तेरा चहा... [अमॄततुल्य चहाची अपेक्षा मनात सुद्धा आणु नका!]... पित - पित .. काहींची फोटा-फोटी - फोटोगिरी सुरु... मात्र पुन्हा गाइड सायबांच्या आज्ञेला मान देऊन पुढचे चालणे - पठारी - सुरु झाले.. समोरच्या डोंगरावर चढणारी मंडळी आता नजरेत भरु लागली होती... काही अंतरावरच गणेश घाट आणि ह शिडी घाट रस्ता एक होतो... आणि मग दोन्ही रस्त्याचे मुसाफिर एकाच मार्गाने वाटचाल सुरु करतात!
भीमाशंकरचा जंगल ट्रेक करण्यासाठी शारिरीक तयारीबरोबर तुमची मानसीक तयारीही फार महत्त्वाची.. कोणत्याही ट्रेक - भटकंती मध्ये मनात कधीही - मला शक्य नाही किंवा मला जमणार नाही असं आणु नका... बरेच कठीण प्रसंग अगदी तुमच्या इच्छा शक्तीच्या पुढे सहज सोपे होतात... मात्र तुमची माघार तुमच्या बरोबर असणार्‍या साथीदारांनाही कमजोर करते!
जिथे हे दोन रस्ते मिळतात त्या ठीकाणी मोबाइल नेटवर्कही मिळाले.. लागलीच सर्वांनी "घरी यायला उशीर होइल - सुखरुप आहोत" सांगुन टाकले!.... या ठीकाणी झोपडी सारखे हॉटेलही [२] आहेत.. तुम्ही जर परत उतरणार असाल तर जेवणाची ऑर्डर देऊ शकता.... मस्त चिकन वगैरेचा बेत होऊ शकतो.... पण श्रावणात नक्की सांगता येणार नाही.... आणि शिवाय - देवाला - देव कार्याला गेल्यानंतर वेज खाणंच योग्य, नाही का?

चालुन चालुन सारेच दमले होते... शिवाय.. त्या जंगलात चावणारे लहान-लहान कीडे आणि त्यानंतर होणारी खाज यामुळे सगळेच पिसाळुन गेले होते..काही लोकं जे शॉर्टवर आले होते, त्यांचे पाय, विशेषतः, अगदीच लाल-लाल झाले होते... जिकडे - तिकडे लाल टिपके..! आधी म्हटल्या प्रमाणे ही वाट अरुंद असल्यामुळे एका वेळी एकच जाऊ शकतो... त्यामुळे बर्‍याच ठीकाणी ट्राफिक जाम झाल्यासारखं वाटत होतं शिवाय लांबच्या लांब रांगही होतीच... मुंग्यासारखी ..... या ठीकाणी वाटेत अवघड म्हणण्यासारखे पॅचेस नाहीत मात्र बराच वेळ चढाई करत रहावे लागते!

जस जसं वरती चढत होतो.. तस तसं धुकं वाढत होतं.... मात्र .. वातावरण प्रसन्न होत चाललं होतं.... मला स्वत:ला तरी बरंच हलकं आणि फ्रेश वाटत होतं... रस्त्यात अनेक वृद्ध लोकही अगदी विश्वासानं चालताना तर काही अगदी अणवाणी [चप्पल वगैरे न घालता] चालताना दिसले... काही वेळानं धुक्यात अगदी पुर्णपणे हरवलेलं तलाव दिसलं.. काही लोक तिथं स्नान [डुबकी] करत होते... मी आणि इतर काहींनी - बम - भोले म्हणत- झटपट पाण्यात एक-एक डुबकी मारुन घेतली.... वर - वर ठीक वाटणारं पाणी अगदीच चिल्ड होतं, हे पाण्यात उतरल्यावरच जाणवलं! पटापट कपडे बदलले... तो पर्यंत बाकीचे लोक येउन थांबले होते..!..त्या प्रसन्न वातावरणात दुरवर टाळ - घंटानादाचा आवाज जाणवत होता!

एव्हाना ट्रेक सुरु करुन [१ ते६] पाच तास झाले होते... दाट धुक्यात मंदिर शोधणं जरा अवघडच वाटलं.. पण पाणी भरायला आलेल्या एकानं मंदिराचा रस्ता दाखविला.... त्या धुक्यांत अगदी जवळच घंटा - टाळ वाजण्याचा आवाज अस्पष्ट ऐकु येत होता.. आवाज्याचा दिशेने आम्ही पुढं चालत राहिलो आणि अगदी धुक्यात गुडुप झालेलं मंदिर दिसु लागलं! ................................
.......................................................
..................................................................

................................. खांडसला आम्हाला सोडुन गाडी पुन्हा भीमाशंकरला बोलावली होती... त्यामुळे पार्किंगमध्ये गाडी शोधुन त्यात बॅगा वगैरे टाकुन आम्ही दर्शनाला रांगेत उभारलो! रांगेत असतानाच आरतीही सापडली... नशिबवानच - आम्ही सारे! आरती नंतर पिंडीवर डोकं टेकवुन शिवाचं दर्शन झालं... मन आणि शरीर अगदी ताजं - तवाणं..! मंदिराचं बांधकाम अगदी भक्कम दगडी आहे.... अंदाजे १४०० वर्षापुर्वीचं असावं! समोरच शनिचं छोटसं मंदिर.. वरती चिमाजी अप्पांनी वसईहुन आणलेली घंटा बांधली आहे! त्याच्या बाजुलाच दिपमाळ ...! अजुनही काहीसं डाग-डुजींचं काम चालु आहे वाटतं... !

दर्शन होईपर्यंत ८.३० वाजले आणि आता आम्हाला परतीचा विचार करावा लागला.. मुंबईकरांच्या राहण्याची सोय करण्यातच पुन्हा दोन तास गेले... मंदिराच्या आवारातच असणार्‍या खोल्यांत राहण्यास "त्या मुली" तयार नसल्याने पुन्हा शोधा - शोधी सुरु!... एक हॉटेल मिळालं.. ५-७ कि.मी . अंतरावर.. आणि आमची गाडी त्यांना सोडण्यास गेली... मात्र दाट धुक्यात काहीच दिसत नसल्याने १० मिनिटात सारे परतले... आणि त्यांना मंदिराच्या आवारातच रहावे लागले! ... असो.. त्यांना सोडुन आम्ही ११ वाजता आमच्या मार्गी लागलो... पण समोरचं काहीच दिसत नव्हतं! फुल लाइट लाऊनही! ड्रायवरला काचेवर तंबाखु चोळायला सांगुन... कागदाने काच साफ केली... काचेवर थोडा तरी फरक पडला... मात्र समोरचं धुकं हटायला तयार नव्हतं... समोरुन एक इंडिका वाला काही अंतर जाऊन परत आला होता आणि आम्हालाच राहण्याचा पत्ता विचारत होता....!
शेवटी बॅटरी हातात घेऊन मी, सुरिंदर आणि अमोल असं तिघांना काही अंतर जीपच्या समोर रस्ता दाखवत चालायचं ठरवलं... आणि त्याप्रमाणं आमचा परतीचा प्रवास सुरु झाला!
समोरुन येणार्‍या वहानांना लाइट दाखवुन - हळु करत आम्ही चालत होतो....एक - दीड कि.मी. नंतर धुकं मावळलं आणि आणि आम्ही पुन्हा गाडीत बसलो....!

पोटातले कावळे आतापर्यंत मरायला टेकले होते... ढाबा - हॉटेल शोधत राजगुरुनगर आले आणि आम्ही एका ढाब्यावर इथेच्छ जेवण केलं!.... रात्रीचे १.३० वाजले होते...जवेणानंतर सारे, गाडीत मस्त झोपुन गेले...! सकाळी ३.३० ला माझा शेवटचा ड्रॉप झाला...!

घरी पोहचुन मस्त फ्रेश झालो...आणि लागलीच बिछान्यात घुसलो!

हुम्म... नेहमी प्रमाणे.. काही फोटो येथे आहेतच!


काही आठवणी:
  • खांडसमधेच उशिर झाल्यामुळे आम्हाला आंधार पडण्याआधी जंगल पार करणे आवश्यक होते.... मात्र शिडीघाटामुळे काही वेळ वाचवण्यास मदत झाली!
  • या अभयारण्यात आढळणारा शेकरु - खारीसारखा - प्राणी आम्हाला दिसलाच नाही!
  • धुक्यामुळं पुन्हा गाडीच्या पुढं रस्ता दाखवत चालावं लागत होतं... जणु- डु वन ट्रेक अँड गेट वन फ्री!
  • जर तुमचा राहण्याचा प्लान असेल तर त्याचं प्रयोजन आधी च करा... ६-७ कि.मी. वर ब्लु मर्मोन नावाचे हॉटेलआहे..


थोडक्यात भीमाशंकर!

Friday, 31 July 2009

भिमाशंकर - जंगल ट्रेक...

...... ट्रेक वरुन आल्यानंतरच व्यवस्थित लिहिन म्हणतो... तरीपण तुम्ही जावेळेस हे वाचत असाल [शनिवार - १आँगस्ट २००९], त्यावेळी मी मित्रांसोबत भिमाशंकरचा जंगल ट्रेक करत असेन. तुमच्या शुभेच्छा असु द्यात! चला तर - सोमवारी विस्तारपुर्वक बोलु..
तो पर्यंत - बोला - बम भोले.... बम - बम भोले!


भीमाशंकर - पुर्ण लेख लिहिलाय!

Wednesday, 15 July 2009

भटकंती - विकटगड [पेब]


पावसाची वाट बघत बघत जुन महिना कधीचाच संपला.. त्यात कामाचं निमित्त... हे रिलीज - ते रिलीज... हा पॅच - तो पॅच... आणि बरंच काही...! आधीच दुष्काळ त्यात तेरावा महिना!..... ट्रेकींग - भटकंतीला मुहुर्तच लागत नव्हता... गेल्या आठवड्याचा - ४ जुलै चा प्लान होता-होता रद्द झाला.. आता असे प्लान रद्द होणे काही नविन नाही ;) असो... तर गेल्या शनिवारी विकटगड उर्फ पेबला जाऊन आलो. औफिसातले सतिश आणि अर्नब तयार झाले... जुन्या औफिसातुन सुरिंदर, त्याचा मित्र गौरव, ज्यो आणि तिचा नवरा ललित... तर मुंबईहुन विशाल आणि उपेंद्रजी.... चांगले नऊ लोक जमले!

सकाळी ६ ला घरुन निघण्याचा प्लान होता... पण गाडीच आली नाही.. ड्रायव्हर साहेबांना फोन लाऊन लाउन मोबाइलची बॅटरी लो झाली पण साहेबांनी फोनच उचलला नाही.... झाले..! सात - सव्वासातला तो माझ्याकडे - पहिला पिकअप - आला.... चला.. कीमान आला तरी म्हणुन सुरुवात झाली.... रस्त्यात गौरव आणि सुरिंदरला घेऊन आम्ही सतिश आणि अर्नबला पिक-अप केले... आता शेवटचा पिकअप - हिंजवडीचा - ज्यो - ललित... अंदाजे आम्ही आठ वाजता एक्सप्रेसवे पकडला आणि गाडी खोपोली - नेरळ च्या मार्गे [विशाल आणि उपेंद्रजींना घेऊन] माथेरान कडे निघाली... कुठेही न थांबता १० वाजता माथेरानला पोहोचलो. हिरवेगार माथेरान माणसांच्या झुंबडीने गलबलुन गेलं होतं! अगदी बाजार भरल्यासारखं... त्यातच गाईड अन् घोडेवाले यांची विचारपुस! गाडी पार्किंगला लाऊन मस्त नाष्टा केला.... तिकिटं घेऊन [ रु. २५/माणसी, फक्त.] आम्ही ट्रेकला सुरुवात केली..!
विकटगडचा ट्रेक, खरं तर माथेरान च्या जरा खाली, लाइन नं. १३२ किंवा "वौटर पाईप" या ठीकाणी सुरु होतो.. मात्र आम्हाला १३२ नं. - न सापडल्यामुळे आम्ही माथेरानच्या मुख्य एन्ट्री तुन आत गेलो. चालत जाताना मिनिरेल्वेचा ट्रॅक जिथं लागतो, तिथुन उजव्या हाताला वळलं की नं १७८ पासुन, त्या पटरीबरोबर नं. १५७ [अंदाजे] पर्यंत त्याच ट्रॅक वरुन - धबधब्यांच्या बाजुने चालत रहायचं. थोड्याशा पावसानेही सगळं शिवार कसं हिरवंगार झालं होतं.. मधेच येणारे धुक्याचे ढग... छोटे - छोटे धबधबे.. वा! मस्तपैकी फोटो काढत आम्ही चालत होतो.. सतत पडणारा पाऊस मात्र फोटो काढायला अडथळा आणत होता.... पण तशातही आमची कलाकारी चालुच होती...!
नं. १५७ च्या जवळ एक छोटीशी कमान आहे.. म्हणजे या ट्रेकची सुरुवात... कमानीवरची ती छोटी घंटी वाजऊन आम्ही ट्रेकला सुरुवात केली... येथुन खाली उतरावे लागते... पावसामुळे वाट घसरडी झाली होती... त्यामुळे अगदी हळु.. अंदाज घेत आम्ही खाली उतरुन विकटगडाकडे आगेकुच सुरु ठेवली!

गप्पा मारत मारत आम्ही एक-एक टप्पा पार करत होतो... शेवटी गडाच्या मुख्य चढाइला पोहोचलो.. हा पॅच म्हणजे लॅडर - शिडी आहे.. ती पार करुन आम्ही वरती सपाट भागावर पोहोचलो... तिथे पटापट फोटो काढुन गडाच्या मुख्य ठीकाणाकडे निघालो... या पठारी भागावर एक छोटेसे घर[? किंवा मंदिर असावे... आम्ही त्या मार्गे न जाता वळसा घालुन गेलो..!] आहे. त्याच्या समोरुन टेकडी सारख्या भाग पार करुन मुख्य ठीकाणाकडे जाता येते. दुसरा रस्ता खालुन वळसा घालुन जाता येते. म्हणजे.. पठारी भागावर पोहोचल्यानंतर सरळ डाव्या बाजुने चालत रहा... तो रस्ता खाली उतरल्यास गुहेकडे जातो... खाली उतरण्याच्या काही अंतर आधी - अंदाजे ५०० मी. - पाच- सहा दगडी पायर्‍या वरती जाताना दिसतात. या मार्गे वरती दत्त पादुका - मुख्य ठीकाणा - कडे जाता येते. हा रस्ता जरा अवघड आहे. मदतीसाठी एक लोखंडी दोर बांधलेला आहे. त्याचा आधार घेत वरती जाता येते. मात्र पावसात हा रस्ता अगदीच निसरडा असल्याने, तो दोर व्यवस्थित पकडुनच वरती जाता येते. मात्र हा दोर लोखंडी असल्याने काळजी घेणे गरजेचे आहे... काही ठीकाणी खचुन त्यातुन तारा बाहेर आल्या आहेत, तेंव्हा जरा जपुन!

दत्त पादुकांच्या पाठीमागे एका लोखंडी पोलवर भगवा आहे. हेच गडावरचे उंच ठीकाण. येथुन दिसणार्‍या निसर्गाचे - सभोवतालचे वर्णन शब्दांत करणे शक्य नाही... हिरव्या गार डोंगरांच्या रांगा.. धुक्यांचे ढर..... काही डोंगरावर पडलेले ऊन आणि काहींवर ढग.... अप्रतिम - अदभुत - अवर्णनिय !! येथुनच माथेरानच्या मिनि-ट्रेनचे ही दर्शन झाले.. सध्या पावसामुळी ही गाडी प्रवाशांसाठी बंद आहे... मात्र आम्हाला तिचे दर्शन झालेच.... कदाचित रुटीनचा भाग - किंवा ट्रॅक चेकिंग असावे.


पादुकांचे दर्शन घेऊन आम्ही त्याच मार्गाने खाली उतरु लागलो... चढताना काहीसा जाणवणारा त्रास, उतरताना फारच होत होता... त्यात ज्यो आणि ललित पहिल्यांदाच असा प्रयत्न करत होते... त्यामुळे त्या दोघांना व्यवस्थित खाली उतरवणे गरजेचे होते. रस्सी बांधुन त्यांना हळु-हळु खाली उतरवले आणि गुहेच्या दिशेने आम्ही चालु लागलो.

धुक्यामध्ये रस्त्याचा अंदाज येत नव्हता.... या ठीकाणी एक रस्ता/ वाट लागलीच खाली जाताना दिसते.. मात्र ही वाट रिस्की आहे... मी थोडं पुढं जाऊन दुसरी वाट सापडते का ते पाहिले आणि सापडली ही! दगडात खणुन पायर्‍या केलेली एक छोटीशी वाट खाली जाताना दिसली... सावकाश खाली उतरल्या नंतर डाव्या हाताला पाण्याचा एक कुंड आहे... त्याखाली हनुमानची एक छोटीशी मुर्ती ..! आता येथुन खाली उतरण्यासाठी एक लॅडर - शिडी आहे. हे शिडी अगदीच उभी आहे.. त्यामुळे खाली उतरताना पाय व्यवस्थित शिडीवर ठेवणे गरजेचे! शिवाय पाण्याचा फ्लो ही शिडीवरुनच खाली वाहतो, त्यामुळे पाण्याचा हलकासा मार खाण्यासही सज्ज रहा! डोंगराच्या बाजु-बाजुने गुहेच्या ठीकाणी जाता येते.

अंदाजे ४ वा. आम्ही गुहेशी पोहोचलो.... आतापर्यंत पोटातले कावळे बोंबलुन बेशिद्ध पडले होते.. सोबत आणलेले स्नॅक्स खाऊन आम्ही १०-१५ मि. विश्रांती घेण्यास बसलो.... तोपर्यत गुहा बघुन झाली.. दोनही गुहा चांगल्या परिस्थितीत आहेत.. रात्री राहण्यास योग्य! मात्र पावसाची आत्ताच सुरुवात असल्याने म्हणा.. किंवा अजुन लोकांचे राहणे सुरु झाले नसल्याने म्हणा... दोनही गुहा बर्‍यापैकी स्वच्छ होत्या.... पैकी डाव्या - मोठ्या गुहेत स्वामी समर्थांचे मोठे पेंटिंग आहे तर दुसर्‍या गुहेत गणेशाचे मुर्तीवजा पेंटिंग. बाहेरच्या बाजुला समर्थांच्या गादी सदृश एक बैठक - टाइल्स बसवुन केलेली आहे... कदाचित येथे येणार्‍यांनी ती स्वतःची समजुन थोडी घाणही केली होती.... मी आणि विशालने जवळच्या पाण्याने जरा स्वच्छ केली. एव्हाणा अंधार होऊ लागला होता... आणि आम्हाला त्या आधी नेरळला पोहोचणे गरजेचे असल्याने आम्ही समर्थांना नमस्कार करुन उतरणीला लागलो..... नेरळला उतरणार म्हणुन माथेरानला पार्क केलेली गाडी - ड्रायव्हरला फोन करुन नेरळ स्टेशनला घेऊन येण्यास सांगितले!

आतापर्यंत सरळ असणारी वाट येथुन पुढे जरा फसवी आहे... बर्‍याच ठीकाणे उप-वाटा असल्यामुळे चांगलीच फसगत होण्याची शक्यता आहे. आमच्या [वाचलेल्या] माहिती नुसार - जर तुम्ही नेरळच्या बाजुने चढत असाल तर - भला मोठा विजेचा खांब - हे रस्ता बरोबर असल्याचे चिन्ह आहे, असं समजण्यास हरकत नव्हती..... आणि आमच्या डाव्या हाताला असा विजेचा खांब दिसत होता... !! तो खांब साक्ष ठेऊन आम्ही चालत होतो. पुढे गेल्यानंतर पुन्हा एक दगडी पॅच येतो.. अंदाजे ७-८ फुटाचा हा पॅच उतरताना अगदी जेरीस आणतो. विशालने आधी खाली उतरुन सर्वांना खाली उतरण्यास मदत केली आणि एक-एक करत आम्ही खाली आलो.... थोडं अंतर गेल्यानंतर एका ठीकाणी छोटासा चौक येतो... हा सर्वात महत्वाचा चौक आहे!
तुम्ही जर गडावरुन खाली उतरत असाल तर तुम्हाला उजव्या बाजुला खाली उतरायचे आहे - नेरळच्या बाजुला.... हे चांगलं लक्षात ठेवा.... सरळ जाणारा रस्ता पुढे बंद होतो.... मी स्वत: चेक केलाय... आणि डाव्या हाताला पनवेल! आता हे मी सांगु शकतोय - कारण आम्ही डाव्या बाजुनेच खाली उतरलो!!!! नेरळच्या बाजुने चढत असाल तर अडचण नसावी. मात्र माथेरान च्या बाजेने चढुन - नेरळच्या बाजुला उतरत असाल तर हा - उजवा - रस्ता पक्का लक्षात ठेवा!
डाव्या हाताला दिसणार्‍या त्या विजेच्या खांबावर भरोसा ठेऊन डाव्या बाजुने खाली उतरायला सुरुवात केली... रस्ता अगदीच सरळ होता.. मात्र छोटासा आणि निसडाही! त्या मोठा विजेच्या खंबाच्या खालुन चालत आम्ही वळणा-या वाटेने सुमारे एक दिड तासाने खाली उतरलो... अंदाजे ७ वाजता! सुरुवातीलाच काही घरे लागली... एक माणुस जवळच भेटला... म्हटले चला... नेरळचा रस्ता विचारु! आणि.. आणि.. त्याने सांगितले की - आम्ही नेरळच्या बाजुने नाही - तर - पनवेलच्या बाजुने खाली उतरलो आहोत...हे "सत्ती" नावाचे गाव आहे! नेरळकडे जाण्यासाठी वरच्या त्या छोट्या चौकात आम्ही उजव्या बाजुने खाली उतरायला पहिजे होते!!! अगदी विजेचा झटका लागल्या सारखे झाले.... म्हणजे आता परत जंगलातुन त्या पहिल्या विजेच्या खांबापर्यंत वरती जायचे??? नाही...s s s s s s s s s s s s!!!

............................ s s s s s! फोन करुन गाडीच इकडे मागवावी असं मत झाले.... फोन करण्यासाठी मोबाइल काढला तर नेटवर्क गायब! शेवटी त्याच माणसाला विचारले - आता पनवेलला कसे जाता येईल ?... सात वाजता एस.टी. बस येते... सगळ्यांचा नजरा घड्याळावर.. ७.१० झालेले.. म्हणजे - बसही गेली असणार! तो माणुस म्हणाला - कधी कधी बस थांबतेही... तेंव्हा तुम्ही समोरच्या गावात - माळढुंगे - जाऊन तिथुन बस पकडा.. किंवा सिक्स सीटर मिळाले तर बघा! आता आली का पंचाईत? आम्हाला वाटले की बस याच गावातुन आहे.... पण आता बस १५-२० मि. अंतरावर असणार्‍या "माळढुंगे" गावातुन होती.... आधीच अंधार पडायला लागला होता...आणि पुन्हा रस्ता चुकु नये म्हणुन - विशालने त्याच माणसाला रस्ता दाखवण्यासाठी येणास विचारले... नाही - नाही म्हणत अखेर ५० रु. तो बस थांब्यापर्यंत येण्यास तयार झाला.... तो पुढे आणि आम्ही त्याच्या मागे.... चलो माळढुंगे!!
बसच्या ठीकाणी पोहोचलो.... तर कळाले की... आजुन बसच आली नाही.. म्हटले चला.. अजुनही होप आहे... पण आमची ही होप जास्त वेळ नाही टिकली... आज बसच येणार नसल्याचे समजले! आता? सगळ्यांचा मनात एकच - वी आर लौस्ट - मुझे इस जंगल से बचावो... वगैरे - वगैरे...!
एव्हाना.... सगळ्यांनाच चहाची तलफ झाली होती.... वहानाची वाट बघत - चहाची सोय होते का ते विचारले... तर कोरा चहा - ब्लॅक टी - मिळेल असे सांगितले... दुधाचा का नाही - तर - सगळा गावच असा कोरा चहा पितो असं कळालं! चला - कोरा तर कोरा.... गरमा - गरम चहा तर मिळाला - यावरच आम्ही हुरळुन गेलो! आता चर्चा सुरु झाली... पुढे काय... ? येथुन जवळचे ठीकाण म्हणजे - पनवेल - १२ कि.मी.... पण... पनवेलला कसे पोहोचायचे?.. की या गावातच मुक्काम करायचा?

चहा संपता - संपता, एक सिक्स सीटर आली... आणि आमच्या जिवात जीव आला...आता जबाबदारी त्या सिक्स सीटरवाल्याला - पनवेलला सोडण्यासाठी पटवणे... ६०० वरुन ४०० मध्ये तो १२ कि.मी. - पनवेलला सोडण्यास तयार झाला..... सगळे बसलो.... अन आता - चलो पनवेल....! माथेरान वरुन - नेरळला बोलवलेली गाडी आता पनवेलला बोलावणे गरजेचे होते.... पण नेटवर्कच नसल्याने - काहीच करु शकत नव्हतो...! पाच - सहा कि.मी. गेल्यानंतर मोबाइला रेंज मिळाली आणि पटकन ड्रायव्हरला फोन केला...! आणि गाडी - जुन्या पनवेल बस स्टेशनला मागवली.... सर्वांच्या जिवात जीव!
ज्यो आणि ललित साठी तर हा प्रकारही ट्रेकिंग इतकाच नविन होता... जंगल.. ट्रेक... रस्ता चुकणे... कोरा चहा.... सिक्स सीटरच प्रवास...! सर्वच..!!पण दोघांची काहीही तक्रार नव्हती.... एंजाय करतोय असं त्यांचं मत होतं!
अंदाजे ९ वा. आम्ही पनवेलला पोहोचलो.... गाडी येण्यास अजुन एक तास तरी लागणारच होता.. तोपर्यंत - "विनम्र" मध्ये खाऊन घेण्याचे ठरले... मस्तपैकी चिकन कोल्हापुरी खाल्ले...गौरवने मात्र व्हेज मागवले... नंतर समजले - चतुर्थी आहे...! असो... आमच्या देवाला चालते म्हणुन मस्त खाऊन घेतले... १०.३० ला गाडी पनवेलला पोहोचली... विशाल - उपेन्द्रजींना बाय-बाय करुन आमची सोमु [सुमो!] पुण्याच्या मार्गाला लागली....!

दुसरे जातात म्हणुन मलाही जायचे आहे, म्हणुन " उठला अन् ट्रेकला सुटला " असं मात्र करु नका....!!
  • ट्रेकला जाण्यासाठी आधी तयारी करा...ट्रेकिंगचे शुज [एक्शन्चे ट्रेकिंग शुज चांगले आहेत.] असणे हे फार महत्त्वाचे!... दोर - रोप नेहमी जवळ ठेवा.
  • ट्रेकिंगच्या जागेची पुर्ण माहिती मिळवा... त्या जागेचे महत्त्व ... इतिहास जाणा..
  • गडांवर मस्तीसाठी जाऊ नका... मोठमोठ्याने ओरडणे.. गाणी लावणे हे टाळा... त्यासाठी स्वत:चे घर किंवा पब्स आहेतच ना!
  • आपण बरोबर नेलेला कचरा.. प्लीज.. प्लीज आपल्या बरोबरच खाली आणा!
  • गडांवरील बरीचशी ठिकाणं काळाच्या ओघात जीर्ण झाली आहेत... तेंव्हा अशा ठीकाणी खेळ आणि पळापळ करुन उगाचच रिस्क घेऊ नका...!
  • ट्रेकिंगच्या ठीकाणी असलेल्या झाडांना - फुलांना जपा...!
सर्वांना सोडत - सोडत मला घरी पोहोचायला रात्रीचे २ वाजले.... थोडसं तेल अंगाला चोळुन .. मस्त गरमा - गरम पाण्यात अंघोळ केली अन् अंथरुणात घुसलो...!

नेहमीप्रमाणे फोटो येथे आहेतच!!

Monday, 6 July 2009

भटकंती - अधिक माहिती ...

भटकंतीच्या अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळे जरुर पहा:
ट्रेकक्षितिज
सह्याद्री वरील पुस्तके
सह्याद्री
भटकंती
ट्रेकडी
युवाशक्ती
भ्रमंती
पुणे - आसपास
दिपक चौधरी आणि अभिजित अवलसकर

बाकी.... जर तुम्हाला आणखी काही माहिती असेल तर जरुर लिहा ...!

पुणे - गड आणि किल्ले - माहिती...

पावसाच्या सुरुवातीबरोबर माझ्यासारख्या बर्‍याच भटक्यांना सह्याद्रिच्या भटकंती / ट्रेकिंचे भुत लागते. पुणे आणि आसपासचे गड-किल्ल्यांची माहिती गोळा करता करता नाकी - नऊ येते...! पाठीमागे एकदा नेटवरती सापडलेली ही फाइल माझ्या चांगल्याच कामी आली.... पुण्यातील बहुतांशी गडांची माहिती या मध्ये आहे.. कसे जावे... राहण्याची सोय वगैरे माहिती - मराठी मध्ये असणारी ही फाइल तुम्हालाही मदतगार ठरेल असे समजुन येथे देत आहे.

पुणे गड - किल्ले - माहिती

सदर फाइल नेटवर सापडल्यामुळे - मालकाची माहिती नाही

Tuesday, 16 December 2008

भटकंती: कोराईगड [कोरीगड]


गेल्या शनिवारी कोराईगड [कोरीगड] गेलो होतो.. प्लान तसा ट्रेकिंगचा होता.... भैरवगड अथवा गोरखगड फायनल होता होता.. लोणावळ्याजवळचा कोराईगड फिक्स झाला..... तसा हा गड ट्रेकिंगसाठी नाहीच मुळी... अर्थात तुम्ही जर पाय-यावरुन मस्त चालत जाणार असाल तर... नाहीतर पाठीमागच्या बाजुने ट्रेकिंग करण्यासारखा एक रस्ता आहे [कदाचित अंबावणे गावातुन असावा] .. गडावर दोन मोठाली म्हणता येतील अशी तळी आहेत.. एक शिव मंदिर, एक हनुमान - गणेश मंदिर आणि मुख्य 'कोराई देवी' चे मंदिर... शिव आणि हनुमान मंदिरे चांगल्या स्थितित आहेत मात्र कोराई देवीचे मंदिर ओसाड पडले आहे... वरील छप्पर कधीच उडुन गेले आहे.. देवीची सुंदर मुर्ती ऊन - पावसात उभी आहे.... समोर एक दिपमाळ आणि भग्नावस्थेत एक-दोन मुर्त्या.... त्या दिपमाळेवर फडकणारा भगवा वा-यामुळे काठीभोवती अडकुन बसला होता.... व्यवस्थित मोकळा करुन पुन्हा उभा केला.... तोही अभिमानाने फडकण्यास सज्ज..!

.... कोराई देवी कधी काळी अलंकारानी भरलेली असायाची.... इंग्रजांच्या लढाईनंतरच्या काळात या देवीचे सारे दाग-दागिने लुटुन नेण्यात आले ... आजच्या घडीला हे दागिने मुंबईच्या 'मुंबादेवी' च्या अंगावर आहेत - प्र. के. घाणेकर - साद सह्याद्रिची


गडा वरील सारा परिसर एक- दीड तासात फिरुन होतो... डाव्या बाजु / बुरुजावरुन 'ऍम्बे वॅली' चा एरीयल व्ह्युव्ह मस्त दिसतो..! रात्री पांढ-या हॅलोजनच्या प्रकाशात गडाचे दर्शन काही औरच असते...!

खाली उतरुन मस्त जेवण केले आणि परतीच्या वाटेवर - पवना धरणाकडे आगेकुच सुरु केली... धरणाच्या ठीकाणी एस. एन. डी. टी. च्या महिला आल्या असल्यामुळे त्यांचे डुंबुन आणि बोटींग होईपर्यत आम्हीही थोडे फ्रेश होण्यासाठी थोडे पलिकडे असलेला किनारी गेलो... एखादी डुबकी मारण्याची ईच्छा झाली आणि पाण्यात उतरलोही.. बाहेर पाह्तो तो एक पाणसाप आमच्या कडे जसे रागाने पहातच होता... त्याच्यापाठीमागे दुसरा... त्यांचा पुरी फॅमिली यायच्या आत पटापट कपडे घालुन बोटिंग करायला पळालो... बोटिंग केले... मस्त चहा पिलो आणि परतीच्या वाटेला लागलो...

तुम्ही जर पवना धरणाला जाणार असाल तर - पाण्यात उतरु नका अथवा पाणसापांपासुन सावधानगी बाळगा...


बाकी, नेहमी प्रमाणे काही फोटो येथे आहेतच..!


भुंगा...




...भुंगा!

Thursday, 31 July 2008

भटकंती: रतनगड


गेल्या शनिवारी किल्ले रतनगड पाहण्याचा योग आला... रतनवाडील देखणे शिव मंदिर आणि पावसाळी ट्रेक , दोन्ही अगदी मनात राहण्यासारखे..!

मात्र, तुम्ही सध्या रतनगडला जाण्याचा बेत करत असाल तर - चागली पकड - ग्रीप - असणारे बुट अतिशय महत्त्वाचे.. पावसामुळे ब-याच ठीकाणी जमिन निसरडी झाली आहे.. शिवाय गडावर चढताना असणा-या दोन उभ्या शिड्या काळजीपुर्वक पार करा...!

काही छायाचित्रे इथे आहेत ..
...भुंगा!

Tuesday, 17 June 2008

भटकंती: सुधागड


..... गेल्या शनिवारी सुधागडला गेलो होतो ... मस्त पावसात एन्जॉय केला ...
सविस्तर लवकरच लिहितोय ...

काही फोटो येथे आहेत
...भुंगा!

Friday, 28 March 2008

भटकंती: प्रतापगड



दि: २९ मार्च २००८
गड़: कल्ले प्रतापगड
भागीदार: मी, सुभाष, व समर ... सोबत सतीश, आणि चंदू
गाडी: बुलेट

.... येतो ... आलो जाऊन ...!

काही फोटो येथे आहेत.


...भुंगा!


Sunday, 27 January 2008

भटकंती: तोरणा ते राजगड



सप्टेंबर २००४ मध्ये राजगडचा ट्रेक केला होता... आणि गेल्या पावसाळ्यात तोरणा .. मात्र एकाच ट्रेकमध्ये दोन्ही किल्ले पाहण्याचे [ धाडस! ] मी, विशाल आणि कुणालनी ठरवले ... आणि त्याप्रमाणे शनिवार - रविवार, दि २२-२३ डिसेंबरला - पौर्णिमेच्या रात्री आम्ही तोरणा चढलो ... मध्यंतरी तोरण्यावरच्या ब्रह्म पिशाच्या - विषयीही एकले होते आणि १-२ उदाहरणे श्री.प्र. के. घाणेकर सरांच्या "साद सह्याद्रीची ...." या पुस्तकातही सापडली.... म्हटले चला.. पाहु या तरी...!!

अंदाजे रात्री ८ वा. आम्ही तोरण्यावर पोहोचलो... उद्या [ रविवारी ] पौर्णिमा असल्याने आजही चंद्र पुर्णपणे आपले दर्शन देत होता.. गडावर चढताना अजुन तीनजण भेटले ... ज्ञानु, रोहित आणि सुशिल.. पुण्याचे इंजिनिअरिंग डिप्लोमाचे हे तीघे गड उतरण्याच्या तयारीत होते .. मात्र पहिलाच ट्रेक असल्याने थोडेसे गोंधळलेले होते.. शिवाय आजच पुण्याला परतायचे या विचाराने आलेले हे तिघे रात्री खाली उतरण्यासही थोडेसे धास्तावलेलेही...!! मी व विशालने त्यांना आमच्याबरोबरच रात्री थांबुन सकाळी सुरक्षित गड उतरण्याचे सुचवले... आम्हाजवळ असणा-या खाण्या-पिण्याच्या व राहण्याच्या साहित्याची मदत करण्याची आम्ही तयारी दाखवल्यावर ते तयारही झाले.. चला... अजुन तीनजण सोबत झाले... !

गडावर पोहचुन आम्ही तोरणाई व मेंगाई देवीचे दर्शन घेऊन आपला बिस्तारा मांडला आणि शेकोटीसाठी थोड्या लाकडांची जुळवा-जुळव ही केली... एव्हाना पुण्यातल्या नामांकीत आय-टी कंपनीतले पाच लोक रात्रीच्या मुक्कामाची तयारी करुन वरती आले होते... थोडयाशा हाय-हैलो व ओळख-पाळखीनंतर आमची बैठक शेकोटीसमोर चांगलीच रंगली... रात्री अंदाजे १० - १०.३० ला बेळगावचा २०-२२ लोकांचा एक मोठा ग्रुप आरोळ्या व घोषणा देत राजगडावरुन तोरण्यावर पोहोचला .. त्यांच्या घोषणा ह्या राजगडावरुन तोरण्यापर्यंतचा प्रवास सफल केल्याचा आनंदच व्यक्त करत होत्या... मात्र गडावरील शांतीचा भंग होऊ नये म्हणुन त्यांना शांत व्हायला सांगुन आम्ही पुन्हा शेकोटीसमोर बस्तान मांडले आणि त्या बेळगांव वाल्यांनी आपल्या खाटाल्याच्या जेवणाची तयारी सुरु केली...!

शेकोटीसमोर आम्ही "त्या ब्रह्म - पिशाच्या" गप्पा मारु लागलो... पहिल्यादाच ट्रेक आणि गडावर येणारे ते डिप्लोमाचे तिघे अगदी मन लाऊन हे सारे ऐकत होते.. शिवाय ज्ञानु तर मला खोदुन - खोदुन त्या बद्दल विचारत होता...!

रात्री १२.३० पर्यंत वाट पाहुनही आम्हाला ते ब्रह्मपिशाच्च दिसले नाही .. किंवा त्याची जाणीवही झाली नाही... कदाचित आमच्याच आजुबाजुला बसुन ते आपलेच कथन ऐकत असेलही .. नाहीतर पिशाच्चे सर्वांना थोडीच दिसतात...!! ... गंमत केली ... अशा गोष्टींवर किती विश्वास ठेवायचा हे आपणच ठरवायला हवे, नाही का?

जेवणाचे भरपुर सामान आणि सोबतीला एक कोंबडी अशी जेवणाची जय्यत तयारी करुन आलेला हा ग्रुप गड पहायला आलाय की पिकनिक करायला असा प्रश्न स्वाभाविकच मला पडला... गडभेटीला तुम्ही कोंबडी वगैरे कसे काय नेता राव..? .. अर्थात त्या बरोबर बाटली ही आणलीच असेल नाही का? .. असेलही कदाचित ... त्यांच्या जेवणाची तयारी होईपर्यंत आम्ही झोपायची तयारी सुरु केली होती... सकाळी लवकर उठुन सुर्योदय बघायचा होता ना.. आणि शिवाय राजगडाच्या दिशेने आगेकुच ही ..!!


सकाळी सुर्योदय पाहण्याचे भाग्य फारच कमी ... नाहीतर पुण्यात - चारी बाजुला वाढलेल्या सिमेंट्च्या जंगलात- सुर्योदय आणि सुर्यास्त कधी आणि कोणत्या दिशेला होतो हे पाहणे दुर्मिळच ..! मेंगाईदेवीच्या समोरच्या बुरुजावरुन राजगडावर होणारा सुर्योदय अगदी डोळ्याचे पारणे फेडणारा ...!! हळुहळु वर येणारा तो तेजोगोल पाहताना अखंड आणि अवर्णनिय अशा आनंदाची अनुभुती होते ... आता हे अवघड शब्द आणि त्याचा अर्थ समजायचा असेल तर तोरणा भेटीशिवाय पर्याय नाही ..!

पटापट उगवणा-या सुर्याचे फ़ोटो काढुन घेतले .. त्यात कुणालचे, अर्थातच, फ़ोटो सेशन ही आलेच... ओघाने.. असो..!

तोरण्याच्या बुधला माचीवरुन राजगडाच्या संजीवनीमाचीवर जाण्यासाठी एक कच्चा रस्ता आहे.. तसा थोडासा अवघड, निसरडा हा रस्ता निर्जन आहे.. रस्त्यात एखादा ट्रेकर भेटला तरच नाहीतर पाच-साडेपाच तासाचे हे अंतर तुमच्या सहनशिलतेचा अंत पाहण्यासाठी पुरेसा आहे... रस्त्यामध्ये पाण्याची सोय नाही... म्हणजे स्वतःजवळ असलेले पाणी जपुन वापरा एवढेच सांगणे... तसे रस्त्यात चार - पाच उंब-याची एक वाडी लागते... आमच्या जवळचे पाणी संपत आल्याने आम्ही या वाडीवाल्या एका घरातुन पाच रुपयाला एक बाटली या प्रमाणे पाच बाटल्या भरुन घेतल्या व एक-एक कप चहाही... शहराच्या धकाधकीपासुन दुर हा भाग फारच मागासलेला ... दारात एक कोंबडी आपल्या पिलांना जवळ करुन खायला भरवत होती... आईचे प्रेम सर्व प्राण्यांत सारखेच... नाही का?

थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही राजगडाकडे पुन्हा चालायला सुरुवात केली.. एव्हाना सुर्य बराच वर आला होता... अंदाजे दुपारी १२ वाजता आम्ही संजीवनी माचीवर पोहोचलो... संजीवनी माचीवर पोहोचलो तेंव्हा पोटातील कावळे मेले की काय असे वाटायला लागले होते... जवळचाच एक आडोसा पाहुन आम्ही चुल पेटवली आणि "दोन-मिनिटवाली - मॅगी" बनवली... तसे घरी असल्यावर मी मॅगीकडे चुकुनसुद्धा पहात नाही ... मात्र पोट भरण्याचा हा मार्ग फारच सोपा आणि सोयिस्कर असल्याची जाणीव मला या ट्रेकच्यावेळी झाली.... पोट भरुन झाल्यावर स्वीट-डीश म्हणुन आम्ही चहा ठेवला.... मात्र गाळण घरीच विसरल्याने, न गाळताच कडक चहा पिलो.... असा कडक चहा या आधी कधी पिल्याचे मला आठवत नाही.. काहीही असो.. तो चहा मात्र फक्कड झाला होता...!

गडावर आज जरा जास्तच लोकं दिसत होती... थोड्या वेळानं लक्षात आलं की - राजगडावर - एक, "राजगड - पदभ्रमण" शिबीर चालु आहे... आपल्या इतिहासाबद्दल जाणीव करुन देण्याची ही पद्धत फारच प्रभावी वाटली... एखादे-दोन परदेशी पाहुणेसुद्धा नजरेस पडले... काही महिला आपल्या लहानग्यांना घेऊन या शिबिरात सहभागी झाल्या होत्या ... एवढ्याशा वयात त्या लहानग्यांना गडावर पळताना पाहुन कळत-नकळत का होईना मला त्यांचा हेवा वाटला.... कारण स्वाभाविकच होते... आमच्या सारख्यांना बराच वेळ लागला - गड - किल्ले, आणि आपला इतिहास समजुन घ्यायला... मात्र ही बालके जीवनाच्या सुरुवातीलाच हे सारे अनुभुत होती....!!

राजगडावर ब-यापैकी फिरुन झाले.. पुन्हा एकदा फोटो काढुन झाले .... सुर्य आता मावळतीकडे झुकला होता आणि पौर्णिमेचा चंद्र आकाशात वर चढु लागला होता... पौर्णिमेचा हा काळ - सुर्य मावळतीला आणि चंद्र उगवतीला असताना दोघांना पाहणे अगदी दुरापास्त आहे.... पुण्यातुन तरी हे शक्य वाटत नाही...!
... वेळेचा ईशारा समजुन आम्ही गड उतरायला सुरुवात केली.... हळु - हळु... गप्पा मारत... पद-भ्रमणाच्या शिबिराला आलेले काही आजोबा लोक अजुनही राजगड चढत होते.... त्यांच्याबरोबर काही तरुणही हाश्श.. हुश्श करत चढत होते... तो सीन पाहुन जुण्या - झंडु च्यवनप्राशच्या जाहिरातीची आठवण झाली..... आठवली का..? "साठ साल के बुढे - या साठ साल के जवान ..!" .. बरोबर!!

गडाच्या पायथ्याशी असलेल्या गुंजावणे गावात थोडे खाऊन मग पुण्याचा रस्ता पकडायचा बेत होता.. मात्र शेवटची बस गेल्याने... त्या वेळी हजर असलेल्या दुधाच्या गाडीने आम्ही खेड शिवापुरला आलो... आता मात्र जेवल्याशिवाय पुढे जाणे कठीण होते, म्हणुन तिथेच एका होटेलमध्ये इथेच्च खाऊन घेतले आणि मग पुण्याकडे आमचा दौरा सुरु झाला... अंदाजे रात्री ९ वाजता पुण्यात पोहोचलो ... ९.३० ला घरी.... मस्तपैकी अंघोळ करुन निद्राधिन ...!!

माझ्या किल्ल्यांच्या एकंदरीत प्रवासामध्ये ब-याच गोष्टी मला शिकायला मिळाल्या... काही नवीन .. काही जुन्या - पुन्हा नव्या झालेल्या.... इतिहासाचे अनेक - चांगले वाईट पैलु .... आणि हीच माझी शिदोरी आहे..!

मात्र ब-याच ठीकाणी मला काही तरी चुकीचे आहे - होत आहे याची जाणीवही झाली.. गडांवर जाताना मी ब-याच लोकांना पिकनिकला गेल्यासारखे वागताना पाहिलय... जसे -


राजमाचीच्या ट्रेकच्या वेळी, अगदी एक ग्रुप- अंदाजे १७-१९ वयातला असावा... गडावर गाणी लाऊन नाचत होता.. सोबतच्या मुलीही मोठ्-मोठ्याने ओरडुन त्या नाच्यांना प्रोत्साहित करत होत्या ... हे गड - किल्ले आपली संस्कृतीची आधारस्थाने आहेत.. मंदिरे आहेत याची जराही जाणीव या गाढवांना कशी असु नये?

हरिश्चंद्र गडावर एक ग्रुप पिऊन एवढा धुंद होता की विचारु नका... यांचा मोरक्या तर अक्षरश: विवस्त्र - हो... अगदी विवस्त्र .. होऊन शेकोटीसमोर नाचत होता...

एका आय-टी कंपनीचा [माझ्याकडे यांचा व्हीडीओ शुट आणि फोटो सुध्दा आहेत] भला मोठा ग्रुप या ठीकाणी आपल्या कामगारांची "कसली तरी" परिक्षा घेत होता.. आणि त्या अंतर्गत ४-५ लोकांचा एक असे पाच-सहा ग्रुप जोर-जोराने "अल्फा - बीटा" असे ओरडत पळत होते... काय म्हणावे यांना...? हजारो वर्षांच्या जुन्या आणि पवित्र ठीकाणी तुम्हाला तुमच्या असल्या परीक्षा घेताना लाज नाही का वाटली..? ... तोंड वर करुन पळणारे ती माकडे त्या जागेचे पावित्र्य नष्ट करताहेत.. याची साधी जाणीवही होऊ नये..?

त्यांच्यातल्या एका महान गाढवाने सिगारेट पिऊन ते थोटुक वाळलेल्या गवतात निर्लज्यपणे फेकुन दिले आणि एक्-दोन मिनिटातच तिथे आग लागली... हे घडले ते मुख्य गणपती गुहेच्या वरती..!

.... ...... अहो, तुम्हाला असलेच प्रकार करायचे आहेत तर त्यासाठी अनेक ठीकाणे आहेत... मात्र गडांवर- किल्ल्यांवर, मंदिरांच्या जागी जाऊन असला प्रकार करु नका... इतिहास आणि संस्कृतिचा अभिमान असणा-यांच्या सहनशिलतेचा अंत पाहु नका...!


... किल्ल्यावर कशाला जातोस... काय राहिले आहे तिथं आता? ... अनेकवेळा मला विचारला गेलेला हा प्रश्न ... याचं उत्तरदेण्यासाठी मी श्री. प्र. के. घाणेकर सरांच्या "साद सह्याद्रीची... भटकंती किल्ल्यांची" यापुस्तकातील हा उतारा देतोय ...


किल्ल्यावर जावंच कशाला?
या प्रश्नाला उत्तर एकच, "किल्ले आहेत म्हणुन तेथे जावं." पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजेआपल्या भुगोलाला पुढील अनेक पिढ्यांनी गौरवानं-अभिमानानं सांगावं असा इतिहास जिथंघडला तिथं जाणं अगत्याचं आहे, प्रत्येक महाराष्ट्रीकाचं ते आद्य कर्तव्य आहे. पण तिथंजाताना तिथल्या इतिहासाची आपल्याला जाणीव हवी. नाहीतर आज तिथं दिसतीलढासळलेले बुरुज, माना टाकलेल्या कमानी, पडलेली तटबंदी अन ओहोरलेली टाकी. पण हीचती ठीकाणे जिथे इये देशीचे पुत्र ताठ मानेने वावरले आहेत. जगण्यातला अर्थत्यांच्या मरणाने आपल्याला मिळाला आहे. उत्तरेकडचे किल्ले धड उभे आहेत. त्यांच्यादगडादगडावर कोरीव काम आहे अन आतल्या भिंती, वाडे, दालने शाबुत आहेत. पण त्याचीकिंमत..? फ़ार भयानक किंमत देऊन हे सारं टिकवलं गेलं आहे! आपल्यामुलीबाळी परधर्मीय जुलमी सत्ताधिशांच्या घरी लोटाव्या लागल्या. नावांत सिंह अनकिताबाने राजे असणारे या किल्ल्याचे माल्क आपली धनदौलत, अब्रु आणि मुख्यम्हणजे स्वातंत्र्य त्या सत्तांध - धर्मांध सुलतानांकडे गहाण टाकुन आले होते. म्हणुन हे असे राहिले! शोकेसमध्ये ठेवलेल्या या नटव्या बाहुल्याच.

पण महाराष्ट्रातल्या या रांगड्या किल्ल्यांच तसं नाही. इथले भग्नावशेष हीच या किल्ल्यांची महावीर अन परमवीर चक्रंआहेत. ज्याला आपण दुषण देतो तीच त्यांची भुषणं आहेत. आपल्या लढाऊ परंपरेची ही जिवंत स्मारकं आहेत. अगदी १९१८ च्या शेवटच्या इंग्लिश-मराठे युध्दातही सिंहगड, वासोटा, रायगडचे किल्ले भांडवल केले गेले. त्यात त्यांच नुकसानझालं. एकावर एक दगड ठेवुन हे किल्ले बांधले नाही गेले. मानसांची मने त्यांशी जखडली गेली होती. हे सारं दुर होण्यासाठी डिकीन्सन आणि एतरांनी बुध्द्याच हे किल्ले ढासळवुन टाकावेत, किल्ल्यावर जाण्याचे मार्गच तोडावेत व स्वातंत्र्याची कारंजी मुळात नष्ट करावीत असे मनी धरुन मोहिम मांडुन हे उध्वस्तीकरण केले. काही प्रमाणात इंग्लिशांना त्यात यशही आले. पण घामाचा पाऊसपाडुन अन रक्ताचा सडा शिंपुन ही दुर्गपुष्पे इये देशी वाढवली गेली-टिकवली गेली हे विसरुन चालणार नाही !


अधिक फोटो येथे आहेत ..!


...भुंगा!

Friday, 28 December 2007

भटकंती: तोरणा ते राजगड



सप्टेंबर २००४ मध्ये राजगडचा ट्रेक केला होता... आणि गेल्या पावसाळ्यात तोरणा .. मात्र एकाच ट्रेकमध्ये दोन्ही किल्ले पाहण्याचे [ धाडस! ] मी, विशाल आणि कुणालनी ठरवले ... आणि त्याप्रमाणे शनिवार - रविवार, दि २२-२३ डिसेंबरला - पौर्णिमेच्या रात्री आम्ही तोरणा चढलो ... मध्यंतरी तोरण्यावरच्या ब्रह्म पिशाच्या - विषयीही एकले होते आणि १-२ उदाहरणे श्री.प्र. के. घाणेकर सरांच्या "साद सह्याद्रीची ...." या पुस्तकातही सापडली.... म्हटले चला.. पाहु या तरी...!!





अंदाजे रात्री ८ वा. आम्ही तोरण्यावर पोहोचलो... उद्या [ रविवारी ] पौर्णिमा असल्याने आजही चंद्र पुर्णपणे आपले दर्शन देत होता.. गडावर चढताना अजुन तीनजण भेटले ... ज्ञानु, रोहित आणि सुशिल.. पुण्याचे इंजिनिअरिंग डिप्लोमाचे हे तीघे गड उतरण्याच्या तयारीत होते .. मात्र पहिलाच ट्रेक असल्याने थोडेसे गोंधळलेले होते.. शिवाय आजच पुण्याला परतायचे या विचाराने आलेले हे तिघे रात्री खाली उतरण्यासही थोडेसे धास्तावलेलेही...!! मी व विशालने त्यांना आमच्याबरोबरच रात्री थांबुन सकाळी सुरक्षित गड उतरण्याचे सुचवले... आम्हाजवळ असणा-या खाण्या-पिण्याच्या व राहण्याच्या साहित्याची मदत करण्याची आम्ही तयारी दाखवल्यावर ते तयारही झाले.. चला... अजुन तीनजण सोबत झाले... !

गडावर पोहचुन आम्ही तोरणाई व मेंगाई देवीचे दर्शन घेऊन आपला बिस्तारा मांडला आणि शेकोटीसाठी थोड्या लाकडांची जुळवा-जुळव ही केली... एव्हाना पुण्यातल्या नामांकीत आय-टी कंपनीतले पाच लोक रात्रीच्या मुक्कामाची तयारी करुन वरती आले होते... थोडयाशा हाय-हैलो व ओळख-पाळखीनंतर आमची बैठक शेकोटीसमोर चांगलीच रंगली... रात्री अंदाजे १० - १०.३० ला बेळगावचा २०-२२ लोकांचा एक मोठा ग्रुप आरोळ्या व घोषणा देत राजगडावरुन तोरण्यावर पोहोचला .. त्यांच्या घोषणा ह्या राजगडावरुन तोरण्यापर्यंतचा प्रवास सफल केल्याचा आनंदच व्यक्त करत होत्या... मात्र गडावरील शांतीचा भंग होऊ नये म्हणुन त्यांना शांत व्हायला सांगुन आम्ही पुन्हा शेकोटीसमोर बस्तान मांडले आणि त्या बेळगांव वाल्यांनी आपल्या खाटाल्याच्या जेवणाची तयारी सुरु केली...!

शेकोटीसमोर आम्ही "त्या ब्रह्म - पिशाच्या" गप्पा मारु लागलो... पहिल्यादाच ट्रेक आणि गडावर येणारे ते डिप्लोमाचे तिघे अगदी मन लाऊन हे सारे ऐकत होते.. शिवाय ज्ञानु तर मला खोदुन - खोदुन त्या बद्दल विचारत होता...!
श्री. घाणेकर सरांच्या पुस्तकातील हे दोन संदर्भः

रात्री १२.३० पर्यंत वाट पाहुनही आम्हाला ते ब्रह्मपिशाच्च दिसले नाही .. किंवा त्याची जाणीवही झाली नाही... कदाचित आमच्याच आजुबाजुला बसुन ते आपलेच कथन ऐकत असेलही .. नाहीतर पिशाच्चे सर्वांना थोडीच दिसतात...!! ... गंमत केली ... अशा गोष्टींवर किती विश्वास ठेवायचा हे आपणच ठरवायला हवे, नाही का?

जेवणाचे भरपुर सामान आणि सोबतीला एक कोंबडी अशी जेवणाची जय्यत तयारी करुन आलेला हा ग्रुप गड पहायला आलाय की पिकनिक करायला असा प्रश्न स्वाभाविकच मला पडला... गडभेटीला तुम्ही कोंबडी वगैरे कसे काय नेता राव..? .. अर्थात त्या बरोबर बाटली ही आणलीच असेल नाही का? .. असेलही कदाचित ... त्यांच्या जेवणाची तयारी होईपर्यंत आम्ही झोपायची तयारी सुरु केली होती... सकाळी लवकर उठुन सुर्योदय बघायचा होता ना.. आणि शिवाय राजगडाच्या दिशेने आगेकुच ही ..!!

सकाळी सुर्योदय पाहण्याचे भाग्य फारच कमी ... नाहीतर पुण्यात - चारी बाजुला वाढलेल्या सिमेंट्च्या जंगलात- सुर्योदय आणि सुर्यास्त कधी आणि कोणत्या दिशेला होतो हे पाहणे दुर्मिळच ..! मेंगाईदेवीच्या समोरच्या बुरुजावरुन राजगडावर होणारा सुर्योदय अगदी डोळ्याचे पारणे फेडणारा ...!! हळुहळु वर येणारा तो तेजोगोल पाहताना अखंड आणि अवर्णनिय अशा आनंदाची अनुभुती होते ... आता हे अवघड शब्द आणि त्याचा अर्थ समजायचा असेल तर तोरणा भेटीशिवाय पर्याय नाही ..!

पटापट उगवणा-या सुर्याचे फ़ोटो काढुन घेतले .. त्यात कुणालचे, अर्थातच, फ़ोटो सेशन ही आलेच... ओघाने.. असो..!

तोरण्याच्या बुधला माचीवरुन राजगडाच्या संजीवनीमाचीवर जाण्यासाठी एक कच्चा रस्ता आहे.. तसा थोडासा अवघड, निसरडा हा रस्ता निर्जन आहे.. रस्त्यात एखादा ट्रेकर भेटला तरच नाहीतर पाच-साडेपाच तासाचे हे अंतर तुमच्या सहनशिलतेचा अंत पाहण्यासाठी पुरेसा आहे... रस्त्यामध्ये पाण्याची सोय नाही... म्हणजे स्वतःजवळ असलेले पाणी जपुन वापरा एवढेच सांगणे... तसे रस्त्यात चार - पाच उंब-याची एक वाडी लागते... आमच्या जवळचे पाणी संपत आल्याने आम्ही या वाडीवाल्या एका घरातुन पाच रुपयाला एक बाटली या प्रमाणे पाच बाटल्या भरुन घेतल्या व एक-एक कप चहाही... शहराच्या धकाधकीपासुन दुर हा भाग फारच मागासलेला ... दारात एक कोंबडी आपल्या पिलांना जवळ करुन खायला भरवत होती... आईचे प्रेम सर्व प्राण्यांत सारखेच... नाही का?

थोडीशी विश्रांती घेऊन आम्ही राजगडाकडे पुन्हा चालायला सुरुवात केली.. एव्हाना सुर्य बराच वर आला होता... अंदाजे दुपारी १२ वाजता आम्ही संजीवनी माचीवर पोहोचलो... संजीवनी माचीवर पोहोचलो तेंव्हा पोटातील कावळे मेले की काय असे वाटायला लागले होते... जवळचाच एक आडोसा पाहुन आम्ही चुल पेटवली आणि "दोन-मिनिटवाली - मॅगी" बनवली... तसे घरी असल्यावर मी मॅगीकडे चुकुनसुद्धा पहात नाही ... मात्र पोट भरण्याचा हा मार्ग फारच सोपा आणि सोयिस्कर असल्याची जाणीव मला या ट्रेकच्यावेळी झाली.... पोट भरुन झाल्यावर स्वीट-डीश म्हणुन आम्ही चहा ठेवला.... मात्र गाळण घरीच विसरल्याने, न गाळताच कडक चहा पिलो.... असा कडक चहा या आधी कधी पिल्याचे मला आठवत नाही.. काहीही असो.. तो चहा मात्र फक्कड झाला होता...!

गडावर आज जरा जास्तच लोकं दिसत होती... थोड्या वेळानं लक्षात आलं की - राजगडावर - एक, "राजगड - पदभ्रमण" शिबीर चालु आहे... आपल्या इतिहासाबद्दल जाणीव करुन देण्याची ही पद्धत फारच प्रभावी वाटली... एखादे-दोन परदेशी पाहुणेसुद्धा नजरेस पडले... काही महिला आपल्या लहानग्यांना घेऊन या शिबिरात सहभागी झाल्या होत्या ... एवढ्याशा वयात त्या लहानग्यांना गडावर पळताना पाहुन कळत-नकळत का होईना मला त्यांचा हेवा वाटला.... कारण स्वाभाविकच होते... आमच्या सारख्यांना बराच वेळ लागला - गड - किल्ले, आणि आपला इतिहास समजुन घ्यायला... मात्र ही बालके जीवनाच्या सुरुवातीलाच हे सारे अनुभुत होती....!!

राजगडावर ब-यापैकी फिरुन झाले.. पुन्हा एकदा फोटो काढुन झाले .... सुर्य आता मावळतीकडे झुकला होता आणि पौर्णिमेचा चंद्र आकाशात वर चढु लागला होता... पौर्णिमेचा हा काळ - सुर्य मावळतीला आणि चंद्र उगवतीला असताना दोघांना पाहणे अगदी दुरापास्त आहे.... पुण्यातुन तरी हे शक्य वाटत नाही...!
... वेळेचा ईशारा समजुन आम्ही गड उतरायला सुरुवात केली.... हळु - हळु... गप्पा मारत... पद-भ्रमणाच्या शिबिराला आलेले काही आजोबा लोक अजुनही राजगड चढत होते.... त्यांच्याबरोबर काही तरुणही हाश्श.. हुश्श करत चढत होते... तो सीन पाहुन जुण्या - झंडु च्यवनप्राशच्या जाहिरातीची आठवण झाली..... आठवली का..? "साठ साल के बुढे - या साठ साल के जवान ..!" .. बरोबर!!

गडाच्या पायथ्याशी असलेल्या गुंजावणे गावात थोडे खाऊन मग पुण्याचा रस्ता पकडायचा बेत होता.. मात्र शेवटची बस गेल्याने... त्या वेळी हजर असलेल्या दुधाच्या गाडीने आम्ही खेड शिवापुरला आलो... आता मात्र जेवल्याशिवाय पुढे जाणे कठीण होते, म्हणुन तिथेच एका होटेलमध्ये इथेच्च खाऊन घेतले आणि मग पुण्याकडे आमचा दौरा सुरु झाला... अंदाजे रात्री ९ वाजता पुण्यात पोहोचलो ... ९.३० ला घरी.... मस्तपैकी अंघोळ करुन निद्राधिन ...!!

माझ्या किल्ल्यांच्या एकंदरीत प्रवासामध्ये ब-याच गोष्टी मला शिकायला मिळाल्या... काही नवीन .. काही जुन्या - पुन्हा नव्या झालेल्या.... इतिहासाचे अनेक - चांगले वाईट पैलु .... आणि हीच माझी शिदोरी आहे..!

मात्र ब-याच ठीकाणी मला काही तरी चुकीचे आहे - होत आहे याची जाणीवही झाली.. गडांवर जाताना मी ब-याच लोकांना पिकनिकला गेल्यासारखे वागताना पाहिलय... जसे -

राजमाचीच्या ट्रेकच्या वेळी, अगदी एक ग्रुप- अंदाजे १७-१९ वयातला असावा... गडावर गाणी लाऊन नाचत होता.. सोबतच्या मुलीही मोठ्-मोठ्याने ओरडुन त्या नाच्यांना प्रोत्साहित करत होत्या ... हे गड - किल्ले आपली संस्कृतीची आधारस्थाने आहेत.. मंदिरे आहेत याची जराही जाणीव या गाढवांना कशी असु नये?

हरिश्चंद्र गडावर एक ग्रुप पिऊन एवढा धुंद होता की विचारु नका... यांचा मोरक्या तर अक्षरश: विवस्त्र - हो... अगदी विवस्त्र .. होऊन शेकोटीसमोर नाचत होता...

एका आय-टी कंपनीचा [माझ्याकडे यांचा व्हीडीओ शुट आणि फोटो सुध्दा आहेत] भला मोठा ग्रुप या ठीकाणी आपल्या कामगारांची "कसली तरी" परिक्षा घेत होता.. आणि त्या अंतर्गत ४-५ लोकांचा एक असे पाच-सहा ग्रुप जोर-जोराने "अल्फा - बीटा" असे ओरडत पळत होते... काय म्हणावे यांना...? हजारो वर्षांच्या जुन्या आणि पवित्र ठीकाणी तुम्हाला तुमच्या असल्या परीक्षा घेताना लाज नाही का वाटली..? ... तोंड वर करुन पळणारे ती माकडे त्या जागेचे पावित्र्य नष्ट करताहेत.. याची साधी जाणीवही होऊ नये..?

त्यांच्यातल्या एका महान गाढवाने सिगारेट पिऊन ते थोटुक वाळलेल्या गवतात निर्लज्यपणे फेकुन दिले आणि एक्-दोन मिनिटातच तिथे आग लागली... हे घडले ते मुख्य गणपती गुहेच्या वरती..!

.... ...... अहो, तुम्हाला असलेच प्रकार करायचे आहेत तर त्यासाठी अनेक ठीकाणे आहेत... मात्र गडांवर- किल्ल्यांवर, मंदिरांच्या जागी जाऊन असला प्रकार करु नका... इतिहास आणि संस्कृतिचा अभिमान असणा-यांच्या सहनशिलतेचा अंत पाहु नका...!

... किल्ल्यावर कशाला जातोस... काय राहिले आहे तिथं आता? ... अनेकवेळा मला विचारला गेलेला हा प्रश्न ... याचं उत्तरदेण्यासाठी मी श्री. प्र. के. घाणेकर सरांच्या "साद सह्याद्रीची... भटकंती किल्ल्यांची" यापुस्तकातील हा उतारा देतोय ...

किल्ल्यावर जावंच कशाला?
या प्रश्नाला उत्तर एकच, "किल्ले आहेत म्हणुन तेथे जावं." पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजेआपल्या भुगोलाला पुढील अनेक पिढ्यांनी गौरवानं-अभिमानानं सांगावं असा इतिहास जिथंघडला तिथं जाणं अगत्याचं आहे, प्रत्येक महाराष्ट्रीकाचं ते आद्य कर्तव्य आहे. पण तिथंजाताना तिथल्या इतिहासाची आपल्याला जाणीव हवी. नाहीतर आज तिथं दिसतीलढासळलेले बुरुज, माना टाकलेल्या कमानी, पडलेली तटबंदी अन ओहोरलेली टाकी. पण हीचती ठीकाणे जिथे इये देशीचे पुत्र ताठ मानेने वावरले आहेत. जगण्यातला अर्थत्यांच्या मरणाने आपल्याला मिळाला आहे. उत्तरेकडचे किल्ले धड उभे आहेत. त्यांच्यादगडादगडावर कोरीव काम आहे अन आतल्या भिंती, वाडे, दालने शाबुत आहेत. पण त्याचीकिंमत..? फ़ार भयानक किंमत देऊन हे सारं टिकवलं गेलं आहे! आपल्यामुलीबाळी परधर्मीय जुलमी सत्ताधिशांच्या घरी लोटाव्या लागल्या. नावांत सिंह अनकिताबाने राजे असणारे या किल्ल्याचे माल्क आपली धनदौलत, अब्रु आणि मुख्यम्हणजे स्वातंत्र्य त्या सत्तांध - धर्मांध सुलतानांकडे गहाण टाकुन आले होते. म्हणुन हे असे राहिले! शोकेसमध्ये ठेवलेल्या या नटव्या बाहुल्याच.

पण महाराष्ट्रातल्या या रांगड्या किल्ल्यांच तसं नाही. इथले भग्नावशेष हीच या किल्ल्यांची महावीर अन परमवीर चक्रंआहेत. ज्याला आपण दुषण देतो तीच त्यांची भुषणं आहेत. आपल्या लढाऊ परंपरेची ही जिवंत स्मारकं आहेत. अगदी १९१८ च्या शेवटच्या इंग्लिश-मराठे युध्दातही सिंहगड, वासोटा, रायगडचे किल्ले भांडवल केले गेले. त्यात त्यांच नुकसानझालं. एकावर एक दगड ठेवुन हे किल्ले बांधले नाही गेले. मानसांची मने त्यांशी जखडली गेली होती. हे सारं दुर होण्यासाठी डिकीन्सन आणि एतरांनी बुध्द्याच हे किल्ले ढासळवुन टाकावेत, किल्ल्यावर जाण्याचे मार्गच तोडावेत व स्वातंत्र्याची कारंजी मुळात नष्ट करावीत असे मनी धरुन मोहिम मांडुन हे उध्वस्तीकरण केले. काही प्रमाणात इंग्लिशांना त्यात यशही आले. पण घामाचा पाऊसपाडुन अन रक्ताचा सडा शिंपुन ही दुर्गपुष्पे इये देशी वाढवली गेली-टिकवली गेली हे विसरुन चालणार नाही !
अधिक फोटो येथे आहेत ..!


...भुंगा!