आंबे पूर्णिमा...
11 years ago
From today, painting is dead!
हा बहिरी फार रागीट आहे. बाईमाणसांचा वाराही त्याला चालत नाही. विटाळचांडाळ करविण्यास तो समोरच्या पाताळस्पर्शी दरीत ढकलुन देतो म्हणे [ अर्थात त्यात काही अर्थ नाही हे आता अनुभवाने सर्वांना कळलं आहे. ]
संदर्भः साद सह्याद्रीची - प्र.के. घाणेकर.
या प्रसिध्दिपराड्.मुख बहिरोबाची शहरी पर्यटकांना ओळख करुन देण्याचे श्रेय माननीय श्री.गो. नी. तथा अप्पासाहेब दांडेकरांना जाते.या गुहेतल्या बहिरीला सारेजण "गडदचा बहिरी" म्हणुन ओळखतात. - गडद म्हणजे गुहा.
संदर्भः साद सह्याद्रीची - प्र.के. घाणेकर.
एका साहशी ट्रेकची अनुभुती आणि प्रचंड निसर्गातल्या एका रौद्र देवतेचे दर्शन घेऊन सुखरुप परतल्याचे समाधान सार्यांच्या चेहर्यावर दिसत होते!
पेबच्या भटकंती नंतर आता पुन्हा पावसाळी ट्रेकची स्वप्नं पडु लागली होती.... पण कुठं जायचं... तसे पर्याय भरभुर होते, पण विशाल म्हटला की त्याला भीमाशंकरला त्रिशुल आणि शिवलिंग यांची पुजा करुन स्थापना करायची आहे... मग काय.. भीमाशंकर लाच जायचं ठरलं... मेल - फोनची देवाण-घेवाण झाली आणि १ ऑगस्टला भीमाशंकरचा जंगल ट्रेक करायचा ठरला! इंटरनेवरुन बरीच माहिती काढली... कसं जायचं... कुठ रहायचं... आधी जाऊन आलेल्यांकडुन माहिती घेणं वगैरे - वगैरे! शिडी घाट की गणेश घाट असा वाद बराच रंगला.... कारण शिडी घाट म्हणजे "वन्स इन लाइफटाइम" म्हणता येइल असा थ्रिलिंग आहे, अंदाज एकंदरीत माहितीवरुन आला होताच! तेंव्हा तिथे जाऊनच ठरवु असे ठरवुन पुढच्या तयारीला लागलो.कैलासराणा शिवचंद्रमौळी । फणींद्रमाथां मुकुटीं झळाळी ।
कारुण्यसिंधू भवदु:खहारी । तुजविण शंभो मज कोण तारी ॥ १ ॥
पुर्ण वाचा...
बाकी ... खाल्ल्यानंतर ... आपण आणलेला आपला मौल्यवान कचरा पुन्हा आपल्याच बॅगेत भरुन परत न्या! शहाण्यासी पुन्हा - पुन्हा सांगणे न लगे!..!
भीमाशंकरचा जंगल ट्रेक करण्यासाठी शारिरीक तयारीबरोबर तुमची मानसीक तयारीही फार महत्त्वाची.. कोणत्याही ट्रेक - भटकंती मध्ये मनात कधीही - मला शक्य नाही किंवा मला जमणार नाही असं आणु नका... बरेच कठीण प्रसंग अगदी तुमच्या इच्छा शक्तीच्या पुढे सहज सोपे होतात... मात्र तुमची माघार तुमच्या बरोबर असणार्या साथीदारांनाही कमजोर करते!जिथे हे दोन रस्ते मिळतात त्या ठीकाणी मोबाइल नेटवर्कही मिळाले.. लागलीच सर्वांनी "घरी यायला उशीर होइल - सुखरुप आहोत" सांगुन टाकले!.... या ठीकाणी झोपडी सारखे हॉटेलही [२] आहेत.. तुम्ही जर परत उतरणार असाल तर जेवणाची ऑर्डर देऊ शकता.... मस्त चिकन वगैरेचा बेत होऊ शकतो.... पण श्रावणात नक्की सांगता येणार नाही.... आणि शिवाय - देवाला - देव कार्याला गेल्यानंतर वेज खाणंच योग्य, नाही का?
शेवटी बॅटरी हातात घेऊन मी, सुरिंदर आणि अमोल असं तिघांना काही अंतर जीपच्या समोर रस्ता दाखवत चालायचं ठरवलं... आणि त्याप्रमाणं आमचा परतीचा प्रवास सुरु झाला!
समोरुन येणार्या वहानांना लाइट दाखवुन - हळु करत आम्ही चालत होतो....एक - दीड कि.मी. नंतर धुकं मावळलं आणि आणि आम्ही पुन्हा गाडीत बसलो....!
हुम्म... नेहमी प्रमाणे.. काही फोटो येथे आहेतच!
...... ट्रेक वरुन आल्यानंतरच व्यवस्थित लिहिन म्हणतो... तरीपण तुम्ही जावेळेस हे वाचत असाल [शनिवार - १आँगस्ट २००९], त्यावेळी मी मित्रांसोबत भिमाशंकरचा जंगल ट्रेक करत असेन. तुमच्या शुभेच्छा असु द्यात! चला तर - सोमवारी विस्तारपुर्वक बोलु..
तो पर्यंत - बोला - बम भोले.... बम - बम भोले!

विकटगडचा ट्रेक, खरं तर माथेरान च्या जरा खाली, लाइन नं. १३२ किंवा "वौटर पाईप" या ठीकाणी सुरु होतो.. मात्र आम्हाला १३२ नं. - न सापडल्यामुळे आम्ही माथेरानच्या मुख्य एन्ट्री तुन आत गेलो. चालत जाताना मिनिरेल्वेचा ट्रॅक जिथं लागतो, तिथुन उजव्या हाताला वळलं की नं १७८ पासुन, त्या पटरीबरोबर नं. १५७ [अंदाजे] पर्यंत त्याच ट्रॅक वरुन - धबधब्यांच्या बाजुने चालत रहायचं. थोड्याशा पावसानेही सगळं शिवार कसं हिरवंगार झालं होतं.. मधेच येणारे धुक्याचे ढग... छोटे - छोटे धबधबे.. वा! मस्तपैकी फोटो काढत आम्ही चालत होतो.. सतत पडणारा पाऊस मात्र फोटो काढायला अडथळा आणत होता.... पण तशातही आमची कलाकारी चालुच होती...!नं. १५७ च्या जवळ एक छोटीशी कमान आहे.. म्हणजे या ट्रेकची सुरुवात... कमानीवरची ती छोटी घंटी वाजऊन आम्ही ट्रेकला सुरुवात केली... येथुन खाली उतरावे लागते... पावसामुळे वाट घसरडी झाली होती... त्यामुळे अगदी हळु.. अंदाज घेत आम्ही खाली उतरुन विकटगडाकडे आगेकुच सुरु ठेवली!
दत्त पादुकांच्या पाठीमागे एका लोखंडी पोलवर भगवा आहे. हेच गडावरचे उंच ठीकाण. येथुन दिसणार्या निसर्गाचे - सभोवतालचे वर्णन शब्दांत करणे शक्य नाही... हिरव्या गार डोंगरांच्या रांगा.. धुक्यांचे ढर..... काही डोंगरावर पडलेले ऊन आणि काहींवर ढग.... अप्रतिम - अदभुत - अवर्णनिय !! येथुनच माथेरानच्या मिनि-ट्रेनचे ही दर्शन झाले.. सध्या पावसामुळी ही गाडी प्रवाशांसाठी बंद आहे... मात्र आम्हाला तिचे दर्शन झालेच.... कदाचित रुटीनचा भाग - किंवा ट्रॅक चेकिंग असावे.
तुम्ही जर गडावरुन खाली उतरत असाल तर तुम्हाला उजव्या बाजुला खाली उतरायचे आहे - नेरळच्या बाजुला.... हे चांगलं लक्षात ठेवा.... सरळ जाणारा रस्ता पुढे बंद होतो.... मी स्वत: चेक केलाय... आणि डाव्या हाताला पनवेल! आता हे मी सांगु शकतोय - कारण आम्ही डाव्या बाजुनेच खाली उतरलो!!!! नेरळच्या बाजुने चढत असाल तर अडचण नसावी. मात्र माथेरान च्या बाजेने चढुन - नेरळच्या बाजुला उतरत असाल तर हा - उजवा - रस्ता पक्का लक्षात ठेवा!डाव्या हाताला दिसणार्या त्या विजेच्या खांबावर भरोसा ठेऊन डाव्या बाजुने खाली उतरायला सुरुवात केली... रस्ता अगदीच सरळ होता.. मात्र छोटासा आणि निसडाही! त्या मोठा विजेच्या खंबाच्या खालुन चालत आम्ही वळणा-या वाटेने सुमारे एक दिड तासाने खाली उतरलो... अंदाजे ७ वाजता! सुरुवातीलाच काही घरे लागली... एक माणुस जवळच भेटला... म्हटले चला... नेरळचा रस्ता विचारु! आणि.. आणि.. त्याने सांगितले की - आम्ही नेरळच्या बाजुने नाही - तर - पनवेलच्या बाजुने खाली उतरलो आहोत...हे "सत्ती" नावाचे गाव आहे! नेरळकडे जाण्यासाठी वरच्या त्या छोट्या चौकात आम्ही उजव्या बाजुने खाली उतरायला पहिजे होते!!! अगदी विजेचा झटका लागल्या सारखे झाले.... म्हणजे आता परत जंगलातुन त्या पहिल्या विजेच्या खांबापर्यंत वरती जायचे??? नाही...s s s s s s s s s s s s!!!
बसच्या ठीकाणी पोहोचलो.... तर कळाले की... आजुन बसच आली नाही.. म्हटले चला.. अजुनही होप आहे... पण आमची ही होप जास्त वेळ नाही टिकली... आज बसच येणार नसल्याचे समजले! आता? सगळ्यांचा मनात एकच - वी आर लौस्ट - मुझे इस जंगल से बचावो... वगैरे - वगैरे...!एव्हाना.... सगळ्यांनाच चहाची तलफ झाली होती.... वहानाची वाट बघत - चहाची सोय होते का ते विचारले... तर कोरा चहा - ब्लॅक टी - मिळेल असे सांगितले... दुधाचा का नाही - तर - सगळा गावच असा कोरा चहा पितो असं कळालं! चला - कोरा तर कोरा.... गरमा - गरम चहा तर मिळाला - यावरच आम्ही हुरळुन गेलो! आता चर्चा सुरु झाली... पुढे काय... ? येथुन जवळचे ठीकाण म्हणजे - पनवेल - १२ कि.मी.... पण... पनवेलला कसे पोहोचायचे?.. की या गावातच मुक्काम करायचा?
ज्यो आणि ललित साठी तर हा प्रकारही ट्रेकिंग इतकाच नविन होता... जंगल.. ट्रेक... रस्ता चुकणे... कोरा चहा.... सिक्स सीटरच प्रवास...! सर्वच..!!पण दोघांची काहीही तक्रार नव्हती.... एंजाय करतोय असं त्यांचं मत होतं!अंदाजे ९ वा. आम्ही पनवेलला पोहोचलो.... गाडी येण्यास अजुन एक तास तरी लागणारच होता.. तोपर्यंत - "विनम्र" मध्ये खाऊन घेण्याचे ठरले... मस्तपैकी चिकन कोल्हापुरी खाल्ले...गौरवने मात्र व्हेज मागवले... नंतर समजले - चतुर्थी आहे...! असो... आमच्या देवाला चालते म्हणुन मस्त खाऊन घेतले... १०.३० ला गाडी पनवेलला पोहोचली... विशाल - उपेन्द्रजींना बाय-बाय करुन आमची सोमु [सुमो!] पुण्याच्या मार्गाला लागली....!
दुसरे जातात म्हणुन मलाही जायचे आहे, म्हणुन " उठला अन् ट्रेकला सुटला " असं मात्र करु नका....!!सर्वांना सोडत - सोडत मला घरी पोहोचायला रात्रीचे २ वाजले.... थोडसं तेल अंगाला चोळुन .. मस्त गरमा - गरम पाण्यात अंघोळ केली अन् अंथरुणात घुसलो...!
- ट्रेकला जाण्यासाठी आधी तयारी करा...ट्रेकिंगचे शुज [एक्शन्चे ट्रेकिंग शुज चांगले आहेत.] असणे हे फार महत्त्वाचे!... दोर - रोप नेहमी जवळ ठेवा.
- ट्रेकिंगच्या जागेची पुर्ण माहिती मिळवा... त्या जागेचे महत्त्व ... इतिहास जाणा..
- गडांवर मस्तीसाठी जाऊ नका... मोठमोठ्याने ओरडणे.. गाणी लावणे हे टाळा... त्यासाठी स्वत:चे घर किंवा पब्स आहेतच ना!
- आपण बरोबर नेलेला कचरा.. प्लीज.. प्लीज आपल्या बरोबरच खाली आणा!
- गडांवरील बरीचशी ठिकाणं काळाच्या ओघात जीर्ण झाली आहेत... तेंव्हा अशा ठीकाणी खेळ आणि पळापळ करुन उगाचच रिस्क घेऊ नका...!
- ट्रेकिंगच्या ठीकाणी असलेल्या झाडांना - फुलांना जपा...!
भटकंतीच्या अधिक माहितीसाठी खालील संकेतस्थळे जरुर पहा:
पावसाच्या सुरुवातीबरोबर माझ्यासारख्या बर्याच भटक्यांना सह्याद्रिच्या भटकंती / ट्रेकिंचे भुत लागते. पुणे आणि आसपासचे गड-किल्ल्यांची माहिती गोळा करता करता नाकी - नऊ येते...! पाठीमागे एकदा नेटवरती सापडलेली ही फाइल माझ्या चांगल्याच कामी आली.... पुण्यातील बहुतांशी गडांची माहिती या मध्ये आहे.. कसे जावे... राहण्याची सोय वगैरे माहिती - मराठी मध्ये असणारी ही फाइल तुम्हालाही मदतगार ठरेल असे समजुन येथे देत आहे.

.... कोराई देवी कधी काळी अलंकारानी भरलेली असायाची.... इंग्रजांच्या लढाईनंतरच्या काळात या देवीचे सारे दाग-दागिने लुटुन नेण्यात आले ... आजच्या घडीला हे दागिने मुंबईच्या 'मुंबादेवी' च्या अंगावर आहेत - प्र. के. घाणेकर - साद सह्याद्रिची
तुम्ही जर पवना धरणाला जाणार असाल तर - पाण्यात उतरु नका अथवा पाणसापांपासुन सावधानगी बाळगा...
काही छायाचित्रे इथे आहेत ..

काही फोटो येथे आहेत
जेवणाचे भरपुर सामान आणि सोबतीला एक कोंबडी अशी जेवणाची जय्यत तयारी करुन आलेला हा ग्रुप गड पहायला आलाय की पिकनिक करायला असा प्रश्न स्वाभाविकच मला पडला... गडभेटीला तुम्ही कोंबडी वगैरे कसे काय नेता राव..? .. अर्थात त्या बरोबर बाटली ही आणलीच असेल नाही का? .. असेलही कदाचित ... त्यांच्या जेवणाची तयारी होईपर्यंत आम्ही झोपायची तयारी सुरु केली होती... सकाळी लवकर उठुन सुर्योदय बघायचा होता ना.. आणि शिवाय राजगडाच्या दिशेने आगेकुच ही ..!!
राजमाचीच्या ट्रेकच्या वेळी, अगदी एक ग्रुप- अंदाजे १७-१९ वयातला असावा... गडावर गाणी लाऊन नाचत होता.. सोबतच्या मुलीही मोठ्-मोठ्याने ओरडुन त्या नाच्यांना प्रोत्साहित करत होत्या ... हे गड - किल्ले आपली संस्कृतीची आधारस्थाने आहेत.. मंदिरे आहेत याची जराही जाणीव या गाढवांना कशी असु नये?
हरिश्चंद्र गडावर एक ग्रुप पिऊन एवढा धुंद होता की विचारु नका... यांचा मोरक्या तर अक्षरश: विवस्त्र - हो... अगदी विवस्त्र .. होऊन शेकोटीसमोर नाचत होता...
एका आय-टी कंपनीचा [माझ्याकडे यांचा व्हीडीओ शुट आणि फोटो सुध्दा आहेत] भला मोठा ग्रुप या ठीकाणी आपल्या कामगारांची "कसली तरी" परिक्षा घेत होता.. आणि त्या अंतर्गत ४-५ लोकांचा एक असे पाच-सहा ग्रुप जोर-जोराने "अल्फा - बीटा" असे ओरडत पळत होते... काय म्हणावे यांना...? हजारो वर्षांच्या जुन्या आणि पवित्र ठीकाणी तुम्हाला तुमच्या असल्या परीक्षा घेताना लाज नाही का वाटली..? ... तोंड वर करुन पळणारे ती माकडे त्या जागेचे पावित्र्य नष्ट करताहेत.. याची साधी जाणीवही होऊ नये..?
त्यांच्यातल्या एका महान गाढवाने सिगारेट पिऊन ते थोटुक वाळलेल्या गवतात निर्लज्यपणे फेकुन दिले आणि एक्-दोन मिनिटातच तिथे आग लागली... हे घडले ते मुख्य गणपती गुहेच्या वरती..!
.... ...... अहो, तुम्हाला असलेच प्रकार करायचे आहेत तर त्यासाठी अनेक ठीकाणे आहेत... मात्र गडांवर- किल्ल्यांवर, मंदिरांच्या जागी जाऊन असला प्रकार करु नका... इतिहास आणि संस्कृतिचा अभिमान असणा-यांच्या सहनशिलतेचा अंत पाहु नका...!
किल्ल्यावर जावंच कशाला?या प्रश्नाला उत्तर एकच, "किल्ले आहेत म्हणुन तेथे जावं." पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजेआपल्या भुगोलाला पुढील अनेक पिढ्यांनी गौरवानं-अभिमानानं सांगावं असा इतिहास जिथंघडला तिथं जाणं अगत्याचं आहे, प्रत्येक महाराष्ट्रीकाचं ते आद्य कर्तव्य आहे. पण तिथंजाताना तिथल्या इतिहासाची आपल्याला जाणीव हवी. नाहीतर आज तिथं दिसतीलढासळलेले बुरुज, माना टाकलेल्या कमानी, पडलेली तटबंदी अन ओहोरलेली टाकी. पण हीचती ठीकाणे जिथे इये देशीचे पुत्र ताठ मानेने वावरले आहेत. जगण्यातला अर्थत्यांच्या मरणाने आपल्याला मिळाला आहे. उत्तरेकडचे किल्ले धड उभे आहेत. त्यांच्यादगडादगडावर कोरीव काम आहे अन आतल्या भिंती, वाडे, दालने शाबुत आहेत. पण त्याचीकिंमत..? फ़ार भयानक किंमत देऊन हे सारं टिकवलं गेलं आहे! आपल्यामुलीबाळी परधर्मीय जुलमी सत्ताधिशांच्या घरी लोटाव्या लागल्या. नावांत सिंह अनकिताबाने राजे असणारे या किल्ल्याचे माल्क आपली धनदौलत, अब्रु आणि मुख्यम्हणजे स्वातंत्र्य त्या सत्तांध - धर्मांध सुलतानांकडे गहाण टाकुन आले होते. म्हणुन हे असे राहिले! शोकेसमध्ये ठेवलेल्या या नटव्या बाहुल्याच.
पण महाराष्ट्रातल्या या रांगड्या किल्ल्यांच तसं नाही. इथले भग्नावशेष हीच या किल्ल्यांची महावीर अन परमवीर चक्रंआहेत. ज्याला आपण दुषण देतो तीच त्यांची भुषणं आहेत. आपल्या लढाऊ परंपरेची ही जिवंत स्मारकं आहेत. अगदी १९१८ च्या शेवटच्या इंग्लिश-मराठे युध्दातही सिंहगड, वासोटा, रायगडचे किल्ले भांडवल केले गेले. त्यात त्यांच नुकसानझालं. एकावर एक दगड ठेवुन हे किल्ले बांधले नाही गेले. मानसांची मने त्यांशी जखडली गेली होती. हे सारं दुर होण्यासाठी डिकीन्सन आणि एतरांनी बुध्द्याच हे किल्ले ढासळवुन टाकावेत, किल्ल्यावर जाण्याचे मार्गच तोडावेत व स्वातंत्र्याची कारंजी मुळात नष्ट करावीत असे मनी धरुन मोहिम मांडुन हे उध्वस्तीकरण केले. काही प्रमाणात इंग्लिशांना त्यात यशही आले. पण घामाचा पाऊसपाडुन अन रक्ताचा सडा शिंपुन ही दुर्गपुष्पे इये देशी वाढवली गेली-टिकवली गेली हे विसरुन चालणार नाही !
अधिक फोटो येथे आहेत ..!
जेवणाचे भरपुर सामान आणि सोबतीला एक कोंबडी अशी जेवणाची जय्यत तयारी करुन आलेला हा ग्रुप गड पहायला आलाय की पिकनिक करायला असा प्रश्न स्वाभाविकच मला पडला... गडभेटीला तुम्ही कोंबडी वगैरे कसे काय नेता राव..? .. अर्थात त्या बरोबर बाटली ही आणलीच असेल नाही का? .. असेलही कदाचित ... त्यांच्या जेवणाची तयारी होईपर्यंत आम्ही झोपायची तयारी सुरु केली होती... सकाळी लवकर उठुन सुर्योदय बघायचा होता ना.. आणि शिवाय राजगडाच्या दिशेने आगेकुच ही ..!!
राजमाचीच्या ट्रेकच्या वेळी, अगदी एक ग्रुप- अंदाजे १७-१९ वयातला असावा... गडावर गाणी लाऊन नाचत होता.. सोबतच्या मुलीही मोठ्-मोठ्याने ओरडुन त्या नाच्यांना प्रोत्साहित करत होत्या ... हे गड - किल्ले आपली संस्कृतीची आधारस्थाने आहेत.. मंदिरे आहेत याची जराही जाणीव या गाढवांना कशी असु नये?
हरिश्चंद्र गडावर एक ग्रुप पिऊन एवढा धुंद होता की विचारु नका... यांचा मोरक्या तर अक्षरश: विवस्त्र - हो... अगदी विवस्त्र .. होऊन शेकोटीसमोर नाचत होता...
एका आय-टी कंपनीचा [माझ्याकडे यांचा व्हीडीओ शुट आणि फोटो सुध्दा आहेत] भला मोठा ग्रुप या ठीकाणी आपल्या कामगारांची "कसली तरी" परिक्षा घेत होता.. आणि त्या अंतर्गत ४-५ लोकांचा एक असे पाच-सहा ग्रुप जोर-जोराने "अल्फा - बीटा" असे ओरडत पळत होते... काय म्हणावे यांना...? हजारो वर्षांच्या जुन्या आणि पवित्र ठीकाणी तुम्हाला तुमच्या असल्या परीक्षा घेताना लाज नाही का वाटली..? ... तोंड वर करुन पळणारे ती माकडे त्या जागेचे पावित्र्य नष्ट करताहेत.. याची साधी जाणीवही होऊ नये..?
त्यांच्यातल्या एका महान गाढवाने सिगारेट पिऊन ते थोटुक वाळलेल्या गवतात निर्लज्यपणे फेकुन दिले आणि एक्-दोन मिनिटातच तिथे आग लागली... हे घडले ते मुख्य गणपती गुहेच्या वरती..!
.... ...... अहो, तुम्हाला असलेच प्रकार करायचे आहेत तर त्यासाठी अनेक ठीकाणे आहेत... मात्र गडांवर- किल्ल्यांवर, मंदिरांच्या जागी जाऊन असला प्रकार करु नका... इतिहास आणि संस्कृतिचा अभिमान असणा-यांच्या सहनशिलतेचा अंत पाहु नका...!
किल्ल्यावर जावंच कशाला?या प्रश्नाला उत्तर एकच, "किल्ले आहेत म्हणुन तेथे जावं." पण त्याहीपेक्षा महत्वाचं म्हणजेआपल्या भुगोलाला पुढील अनेक पिढ्यांनी गौरवानं-अभिमानानं सांगावं असा इतिहास जिथंघडला तिथं जाणं अगत्याचं आहे, प्रत्येक महाराष्ट्रीकाचं ते आद्य कर्तव्य आहे. पण तिथंजाताना तिथल्या इतिहासाची आपल्याला जाणीव हवी. नाहीतर आज तिथं दिसतीलढासळलेले बुरुज, माना टाकलेल्या कमानी, पडलेली तटबंदी अन ओहोरलेली टाकी. पण हीचती ठीकाणे जिथे इये देशीचे पुत्र ताठ मानेने वावरले आहेत. जगण्यातला अर्थत्यांच्या मरणाने आपल्याला मिळाला आहे. उत्तरेकडचे किल्ले धड उभे आहेत. त्यांच्यादगडादगडावर कोरीव काम आहे अन आतल्या भिंती, वाडे, दालने शाबुत आहेत. पण त्याचीकिंमत..? फ़ार भयानक किंमत देऊन हे सारं टिकवलं गेलं आहे! आपल्यामुलीबाळी परधर्मीय जुलमी सत्ताधिशांच्या घरी लोटाव्या लागल्या. नावांत सिंह अनकिताबाने राजे असणारे या किल्ल्याचे माल्क आपली धनदौलत, अब्रु आणि मुख्यम्हणजे स्वातंत्र्य त्या सत्तांध - धर्मांध सुलतानांकडे गहाण टाकुन आले होते. म्हणुन हे असे राहिले! शोकेसमध्ये ठेवलेल्या या नटव्या बाहुल्याच.
पण महाराष्ट्रातल्या या रांगड्या किल्ल्यांच तसं नाही. इथले भग्नावशेष हीच या किल्ल्यांची महावीर अन परमवीर चक्रंआहेत. ज्याला आपण दुषण देतो तीच त्यांची भुषणं आहेत. आपल्या लढाऊ परंपरेची ही जिवंत स्मारकं आहेत. अगदी १९१८ च्या शेवटच्या इंग्लिश-मराठे युध्दातही सिंहगड, वासोटा, रायगडचे किल्ले भांडवल केले गेले. त्यात त्यांच नुकसानझालं. एकावर एक दगड ठेवुन हे किल्ले बांधले नाही गेले. मानसांची मने त्यांशी जखडली गेली होती. हे सारं दुर होण्यासाठी डिकीन्सन आणि एतरांनी बुध्द्याच हे किल्ले ढासळवुन टाकावेत, किल्ल्यावर जाण्याचे मार्गच तोडावेत व स्वातंत्र्याची कारंजी मुळात नष्ट करावीत असे मनी धरुन मोहिम मांडुन हे उध्वस्तीकरण केले. काही प्रमाणात इंग्लिशांना त्यात यशही आले. पण घामाचा पाऊसपाडुन अन रक्ताचा सडा शिंपुन ही दुर्गपुष्पे इये देशी वाढवली गेली-टिकवली गेली हे विसरुन चालणार नाही !
अधिक फोटो येथे आहेत ..!